Rayat organization esakal
सातारा

एफआरपीसाठी ठिय्या आंदोलन करु; रयत संघटनेचा इशारा

प्रशांत घाडगे

येत्या आठ दिवसांत ही रक्कम जमा न झाल्यास संबंधित साखर कारखान्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने काल जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदनाद्वारे दिला.

सातारा: गेल्या वर्षी ऊस गळीत हंगामामध्ये कारखान्यांनी ऊसतोड करून नेलेल्या ऊसबिलाची रक्कम एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे, तरीही जिल्ह्यातील काही कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू होऊन सहा महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम जमा केली नाही. येत्या आठ दिवसांत ही रक्कम जमा न झाल्यास संबंधित साखर कारखान्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने काल जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदनाद्वारे दिला. या वेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शंकर शिंदे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे उपस्थित होते.

जिल्ह्यातील काही कारखान्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. जिल्ह्यातील ऊस कारखानदार एफआरपी देण्याचे आश्वासन देऊन ऊस तोड करतात; परंतु जिल्ह्यातील काही कारखान्यांनी अद्यापही ऊसबिलाची एफआरपीची रक्कम दिली नाही. एफआरपीची रक्कम १५ दिवसांत देणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील काही कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीची रक्कम न दिल्यास कारखान्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा एकाच दिवशी दोन परीक्षा, निवडणुकीमुळे MPSCने परीक्षेची तारीख बदलल्यानंतरही गोंधळ

Labourer wins lottery : मजुराने जिंकली १.५ कोटींची लॉटरी पण उभ राहिलं नवं संकट, घर सोडून अख्खं कुटुंबच गायब, नेमकं काय घडलं?

बळीराजासाठी जगण्यापेक्षा मरण बरं! विदर्भात ४ हजार शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर, सरकार कधी गंभीर होणार?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर

Tiger Relocation Chandoli : चांदोली जंगलात आणखी एका वाघीणीची एन्ट्री; ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत ताडोबाची दुसरी मादी दाखल, Video

SCROLL FOR NEXT