Vilasrao Patil-Undalkar esakal
सातारा

कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं अन् उंडाळकरांची झाली 'स्वप्नपूर्ती'

हेमंत पवार

कारखान्यानं 160 दिवसांत पाच लाख मेट्रिक टन उसाचं गाळप केलंय.

कऱ्हाड (सातारा) : शेवाळेवाडी-म्हासोली (जि. सातारा) येथील अथणी शुगर्स-रयत साखर कारखान्यानं (Athani Sugars-Rayat Sugar Factory) यंदाच्या गळीत हंगामात १६० दिवसांत कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उच्चांकी पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा उच्चांक केला. उच्चांकी गाळपामुळं माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर (Vilasrao Patil-Undalkar) यांची स्वप्नपूर्ती झालीय.

डोंगरी विभागात कारखानदारी आणून हा भाग सुजलाम् सुफलाम् बनवताना रयत कारखान्यानं पाच लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त ऊस गाळप व शेजारील कारखान्याच्या बरोबरीनं उसाला दर द्यावा, अशी अपेक्षा कारखान्याचे संस्थापक (कै) विलासराव उंडाळकरांची होती. गेली सहा गळीत हंगामात अथणी रयतनं एक एक टप्पा गाठत यावर्षी पाच लाख टन गळीत पार करत काकांची ही स्वप्नपूर्ती केलीय. यानिमित्तानं रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) यांचे हस्ते युनिट हेड रवींद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील यासह अन्य अधिकाऱ्यांचा सत्कार कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला. अॅड. उंडाळकर म्हणाले, अथणी-रयतच्या भागीदारीस यशस्वी सात वर्षे पूर्ण होत आहेत. सात वर्षे पूर्वी कारखाना विक्री करावा लागतो की काय? अशी अवस्था होती. मात्र, त्या अडचणीतून (कै) विलासकाका आणि अथणीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत आज रयत कारखाना पूर्णपणे कर्ज मुक्त झालाय.

स्पर्धात्मक ऊस भाव देण्यास सक्षम बनला आहे. काकांनी कारखानदारी उभी करताना शेतीच्या पाण्याचे नियोजन केले. यंदा कारखान्याचे पाच लाख मेट्रिक टन गळीत पूर्ण झालं आहे. त्यामध्ये कार्यक्षेत्रातील उसाचे प्रमाण ८० टक्के इतके आहे. यापुढील काळात कारखान्याची विस्तारवाढ करून कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्याना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. युनिट हेड रवींद्र देशमुख म्हणाले, कारखान्यानं १६० दिवसांत पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. १२.२० टक्क्यांनी साखर उतारा राखत सहा लाख नऊ हजार साखर पोत्याचे उत्पादन घेतलं आहे. १५ मार्च पर्यंतची ऊसाची बिले व तोडणी वाहतुकदारांचे वाहतुकीचे पैसेही त्यांना दिले आहेत. अथणी-रयतच्या या यशात संस्थापक (कै) विलासकाका यांनी घालून दिलेले आदर्शवत विचार फार मोलाचे ठरले आहेत. रयत कारखान्याचे अध्यक्ष अँड उदयसिंह पाटील, अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स योगेश पाटील, सुशांत पाटील यांचे मार्गदर्शन व अधिकारी, कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं ठरलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळेही सोबत, काय झाली चर्चा?

NEET वादावरून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाही?; मोदी सरकारच्या भूमिकेची Inside Story... 8 प्रमुख कारणे

Live Updates Marathi : भाजप सरकार गोरगरिबांवर लाठ्या चालवतं; मनोज जरांगेंंनी जंतर मंतरवर व्यक्त केला संताप

Monsoon Update : मॉन्सूनसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ! 'एल निनो'चे सर्वात धोकादायक रूप पाहायला मिळणार, दक्षिण भारतात दुष्काळसदृश्य परिस्थिती

निवृत्तीनंतर अरिजित सिंगचं मोठं कमबॅक! 'या' सिनेमासाठी पुन्हा धरला माईक, भावनिक नात्यासाठी पुनरागमन

SCROLL FOR NEXT