Alcohol Ban esakal
सातारा

Liquor Ban : 'त्यांनी गाव तिथं परमीट रूम-बार सुरू करून पुरस्कार मिळवावे'; कोणी केलीये खरमरीत टीका?

Alcohol Ban : जावळी तालुका १६ वर्षांपूर्वी दारूबंदीच्या (Alcohol Ban) एका वैशिष्ट्यपूर्ण महिलांच्या लढ्याने चर्चेत आला.

सकाळ डिजिटल टीम

महिलांच्या विचारातील परिवर्तनाने क्रांती झाली आणि सहा गावांतून १३ दारूची दुकाने महिलांच्या मतदानाने बाटली आडवी करून बंद झाली.

आनेवाडी : जावळी तालुक्यात होणाऱ्या अवैध दारूविक्रीच्या आडून तालुक्यात मान्‍यताप्राप्‍त दारू दुकाने सुरू व्हावेत, असा खटाटोप करणाऱ्यांचीच भूमिका संशयास्‍पद आहे. त्यामुळे त्यांनी गाव तिथे परमीट रूम व बार सुरू करून पुरस्कार मिळवावे, अशी खरमरीत टीका जावळी तालुका व्यसनमुक्ती संघटनेचे संघटक विलास जवळ (Vilas Javal) यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

जावळी तालुका १६ वर्षांपूर्वी दारूबंदीच्या (Alcohol Ban) एका वैशिष्ट्यपूर्ण महिलांच्या लढ्याने चर्चेत आला. महिलांच्या विचारातील परिवर्तनाने क्रांती झाली आणि सहा गावांतून १३ दारूची दुकाने महिलांच्या मतदानाने बाटली आडवी करून बंद झाली. त्‍याकाळी प्रस्‍थापित पुढाऱ्यांच्‍या बगलबच्चांची दारू दुकाने बंद होणार म्हणून त्यावेळीही अनेकांनी याला विरोध केला होता. आता अशीच काही मंडळी एकत्र येत असून, जावळी तालुक्यातील अवैध दारू बंद होत नाही, मग वैध दारू दुकानांना परवानगी द्या, अशी मागणी करीत आहेत.

यापुढे आमचाच आवाज चालणार, आम्ही इथे एकही दारू व मटका अड्डा चालू देणार नाही, अशी गर्जना काही वर्षांपूर्वी अड्ड्यावर जाऊन तथाकथित नेत्याने केली; पण एका कारवाईनेच ती हवेत का बरे विरली? सत्तेच्या केंद्रस्थानी राहूनही आपल्या गावातील अवैध व्यवसाय का बंद केले नाहीत? यामागचे गौडबंगाल काय? अवैध दारू विक्रेत्यांना धमकावून कोणत्या ढाब्यावर किती बाटल्या रिचविल्या, याच्‍या करामती कॅमेऱ्यात कैद आहेत. हागणदारी मुक्त गावे करण्यासाठी शौचालये बांधली, तरीही लोकं रस्त्याच्या कडेला बसतात म्हणून शौचालये पाडायची का?

गतिरोधक व मार्गदर्शक फलक बसविले, तरी अपघात थांबत नाहीत म्हणून गतिरोधक व सूचना फलक काढून टाकायचे का? असे सवालही पत्रकात करण्‍यात आले आहेत. संशयास्पद भूमिका घेऊन चळवळीला समाजात बदनाम करण्यापेक्षा आपल्याकडे सत्तास्थाने आहेत, आपण पोलिस अधीक्षक यांनाही भेटायला जाणार आहात, तर तथाकथित समाजसेवकांच्या मालमत्तेची, उत्पन्नाची व कर्जाचीही चौकशी करायला सांगा म्हणजे सत्य जनतेसमोर येईल.

ज्‍यांची घरे जळाली, त्‍यांनाच चटके

दारूबंदी करून पुरस्कार मिळविले, असे आपल्याला वाटत असेल, तर आता आपणही जनतेची काळजी घ्या. जावळी तालुक्यातील गाव तिथे परमीट रूम बार सुरू करा, म्हणजे लोकांना मुबलक व स्वस्त दारूही मिळेल. या गावातून त्या गावात जाताना लोकांचे अपघातही होणार नाहीत. लाडक्या बहिणींचे संसारही उद्ध्वस्त होणार नाहीत. ज्यांची घरे व्यसनाधितेच्या आगीत जळाली, त्यांनाच त्याचे चटके जाणवणार. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणारांना त्याची किंमत कधीच कळणार नाही, असेही पत्रकात नमूद केले आहे.

...तर आम्‍ही अवैध दारूधंदे उद्ध्वस्त करू - सौरभ शिंदे

जावळीच्या रणरागिणींनी तालुक्यात मतदानाने दारूबंदी करून इतिहास घडविला. मात्र, आता पोलिसांच्या मदतीने सुरू असलेले अवैध धंदे राजरोसपणे सुरूच ठेवून त्यांच्या लढ्याला तिलांजली देण्‍याचे काम करणाऱ्या दारूधंदेवाल्‍यांविरुद्ध कारवाई नाही केली, तर आम्ही हे धंदे उद्ध्वस्त करू, असा इशारा प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT