Cyber Crime
Cyber Crime Sakal
विज्ञान-तंत्र

भारतातील शैक्षणिक संस्था सायबर हल्ल्याच्या रडारवर

सकाळ डिजिटल टीम

चालू वर्षाच्या पहिल्या तीमाहीमध्ये भारतातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसले . यातच भारतीय शिक्षण क्षेत्राला (Indian Education Sector) सायबर हल्ल्यांचा (Cyber Attacks) सर्वात मोठा धोका असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. भारतानंतर अमेरिका, ब्रिटन, इंडोनेशिया आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. सिंगापूरच्या एआय (AI) संचालित डिजिटल जोखीम व्यवस्थापन एंटरप्राइझ क्लाउडसेक (CloudSEK) च्या थ्रेट रिसर्च अँड इन्फॉर्मेशन अॅनालिटिक्स विभागाद्वारे हा अहवाल तयार करण्यात आलाय. (Indian Education Sector Biggest Target Of Cyber Attackers)

या अहवालात भारतीय शैक्षणिक संस्था आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सायबर धोक्यांचे सर्वात मोठे लक्ष्य असल्याचे समोर आले. कोरोनामुळे सर्वकाही ऑनलाईन झालंय. शिक्षणाचे डिजिटायझेशन आणि ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मचा प्रसार या काळात मोठ्या प्रमाणात वाढला. यातच सायबर हल्ल्यांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ दिसून येत आहे.

भारतातील प्रामुख्याने BYJU, IIM कोझिकोड आणि तामिळनाडू डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन इत्यादी ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्मवरील सायबर हल्ल्यांचा समावेश आहे. तर भारतानंतर युनायटेड स्टेट्स हा जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोबतच हॉवर्ड युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांसारख्या मोठ्या संस्थांवरही सायबर हल्ल्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT