Social Media Sakal
विज्ञान-तंत्र

सोशल मीडिया नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही: IT मंत्रालय

कोणतीही सोशल मीडिया कंपनी नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणू शकत नाही.

सकाळ डिजिटल टीम

कोणतीही सोशल मीडिया कंपनी नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणू शकत नाही, इंटरनेट हे सुरक्षित आणि विश्वासार्ह ठिकाण असायला हवं आणि सर्व प्लॅटफॉर्म त्यांच्या वापरकर्त्यांना जबाबदार आहेत, असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (IT Ministry) अधिकाऱ्यांनी सोमवारी ही म्हटलं आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंपन्यांनी मनमानी करून माहिती काढून टाकल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हे सांगितले आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या एका वर्गात असंतोष वाढत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म त्यांचा कंटेंट काढून टाकतात, असा त्यांचा आरोप आहे. (Social Media cannot infringe on constitutional rights of citizens)

सूत्रांनी सांगितले की विनामूल्य, सुरक्षित, विश्वासार्ह आणि जबाबदार इंटरनेटसाठी मंत्रालय वचनबद्ध आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही लवादाला, मग तो मोठा असो वा छोटा, भारतीय असो की विदेशी, त्याला भारतीय नागरिकांच्या मूलभूत आणि घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही.

सूत्रांनी सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि नियंत्रकांनी वेळोवेळी लागू असलेल्या सर्व कायद्यांचा आणि नियमांचा आदर केला पाहिजे. इंटरनेट हे सर्व वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह ठिकाण असले पाहिजे आणि सर्व मध्यस्थ वापरकर्त्यांना जबाबदार असले पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT