airtel
airtel 
विज्ञान-तंत्र

Airtel ने ऑगस्ट महिन्यात Jio ला केलं क्रॉस

सकाळ ऑनलाईन टीमसा

नवी दिल्ली: देशात जुलै महिन्यात भारतीय दूरसंचार क्षेत्रात रिलायंस जिओ कंपनी आघाडीवर होती. पण आता या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये एअरटेलने ग्राहक मिळवण्यात आघाडी घेतली आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नवीन रिपोर्टनुसार ऑगस्ट 2020 मध्ये एअरटेलला 28.99 लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत, तर जिओला ऑगस्टमध्ये 18.64 लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत. तर दुसऱ्याबाजूल व्होडाफोन आणि आयडिया म्हणजे Vi च्या ग्राहकांतही घट झाल्याचं दिसलं आहे. Vi ला ऑगस्ट महिन्यात 12.28 नवीन ग्राहक मिळाले आहेत.

35.8 टक्क्यांसह जिओ आघाडीवर-
भारतीय दूरसंचार बाजारपेठेत रिलायन्स जिओचा हिस्सा 35.08 टक्क्यांवर गेला आहे, तर एअरटेलचा बाजारपेठेतील हिस्सा 28.12 टक्के आहे. 40 कोटींहून अधिक ग्राहक असलेले रिलायन्स जिओ हे देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ठरली आहे.

ट्रायच्या नव्या आकडेवारीनुसार देशात वायरलेस ग्राहकांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात एकूण वायरलेस ग्राहकांची संख्या 114.418 कोटी होती जी वाढून आता 114.792 कोटींवर गेली आहे. ऑगस्ट महिन्यात ही संख्या 0.33 टक्क्यांनी वाढली आहे.

रिलायन्स जिओला जुलैमध्ये 35.54 लाख नवीन ग्राहक जोडले गेले होते, पण ऑगस्टमध्ये कंपनीचे सुमारे 50 टक्के नुकसान झाले. या महिन्यात जिओला फक्त 18.64 लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत. जुलै महिन्यात एअरटेलला 32.60 लाख ग्राहक मिळाले होते तर ऑगस्टमध्ये 28.99 लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत. एअरटेललाही तोटा सहन करावा लागला आहे. पण नवीन ग्राहक मिळवण्याच्या यादीत एअरटेल आघाडीवर राहिली आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT