Break Up Sakal
Trending News

Heartbreak Insurance Fund : पठ्ठ्याने लढवली शक्कल! ब्रेकअप झाल्यावर मिळाले तब्बल 25 हजार रूपये

ब्रेकअप झालेल्या तरूणाने एक योजना सुरू केली होती. त्यामुळे त्याला ब्रेकअप झाल्यावर २५ हजार रूपये मिळाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आवडत्या व्यक्तीसोबत ब्रेकअप झाल्यावर अनेकजण तणावाखाली येतात, अनेकांना त्रास होत असतो पण एका तरूणाला ब्रेक अप झाल्यामुळे तब्बल २५ हजार रूपये मिळाले आहेत. त्याने रिलेशनमध्ये आल्यानंतर "हर्टब्रेक इन्शुरन्स फंड" नावाची योजना सुरू केली होती त्यामुळे त्याला हे पैसे मिळाले आहेत.

या प्रकाराची माहिती सदर तरूणाने स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. प्रतीक आर्यन असं या तरूणाचे नाव असून त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, आम्ही रिलेशनमध्ये आल्यानंतर एक "हर्टब्रेक इन्शुरन्स फंड" नावाची योजना सुरू केली होती. यामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येकी ५०० रूपये दोघांच्या जॉईन्ट अकाऊंटवर जमा करत होतो.

या प्रेमात जो धोका देईल त्याचा या अकाऊंटवरील पैशावर हक्क असेल असा नियम या योजनेचा होता. आमचे ब्रेकअप झाल्यानंतर आता मला या अकाऊंटवरील पैसे मिळाले आहेत. ही रक्कम २५ हजार रूपये इतकी असून ही योजना फक्त इमानदार लोकांसाठी असल्याचं त्याने सांगितलं आहे.

दरम्यान, त्याने पुढे लिहिताना महिलांवर टोमणासुद्धा मारला आहे. "हर्टब्रेक इन्शुरन्स फंड" या योजनेचा फायदा आपल्यालाही मिळू शकतो असं स्त्रियांना का वाटते? असा मिश्किल टोला प्रतीकने लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT