budget 2022
budget 2022 Sakal media
Union Budget Updates

अर्थसंकल्प : दमणगंगा,पिंजाळ नदी जोड प्रकल्पाद्वारे शिवसेनेला शह ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्पासाठी (Damanganga-pinjal river link project) 2014 मध्ये या प्रकल्पाची चर्चा सुरु झाली होती. केंद्राच्या नदी जोड प्रकल्पात या प्रकल्पाचा समावेश असून 2017 नंतर त्याचा आता केंद्रीय अर्थसंकल्पात (union budget 2022) उल्लेख करण्यात आला आहे. 2015 च्या अंदाजानुसार या प्रकल्पासाठी 3 हजार कोटीहून अधिकचा खर्च आहे.

दमणगंगा पिंजाळ जोड प्रकल्पातून मुंबईला 1 हजार 865 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार होते.तर,महामुंबईसाठीही पाणी उपलब्ध होणार होते. यासाठी दमणगंगा नदीवर धरण बांधून पाणी अडवले जाणार होते. त्यानंतर जलबोगद्यातून हे पाणी प्रस्तावित पिंजाळ प्रकल्पात आणण्यात येणार होते.या प्रकल्पाची चर्चा 2014 पासून सुरु आहे.त्याचा प्रकल्प आराखडाही 2015 मध्ये तयार करण्यात आला होता. त्यानुसार 3 हजार कोटीहून अधिकचा खर्च या प्रकल्पासाठी आहे. केंद्रीय अर्थसकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज चार नदी जोड प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यात या प्रकल्पाचाही उल्लेख आहे.

शिवसेनेला शह

गारगाई पिंजाळ असे धरण प्रकल्प बाजूला ठेवून महानगर पालिकेने गाेराई येथे समुद्राचे पाणी गोेडे करण्याच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे.त्यामुळे दिल्लीतून राज्य सरकारला शह देण्यासाठी या नदी जोड प्रकल्पाची घोषणा करण्यात आली का अशी चर्चा सुरु आहे.

महानगर पालिकाच्या निवडणुका

महामुंबईतील नवी मुंबई,मुंबई ही दोन शहरे सोडली तर इतर शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. या वर्षात मुंबईसह या महानगर पालिकांच्या निवडणुका होणार आहेत.त्यामुळे दिल्लीतून थेट या शहरांची पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे चित्र निर्माण केले जात असावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT