water canal Esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 25 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; जिल्हाधिकारी शर्मा यांचा आदेश

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : वाडी-शेवाडी (ता. शिंदखेडा) मध्यम प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्यातून १९०.७३६ दक्षलक्ष घनफूट पाण्याचे अवर्तन सोडण्याचा आदेश शुक्रवारी (ता. १९) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पाटबंधारे विभागाला दिला.

या आवर्तनामुळे शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीकाठावरील २५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. (Collector ordered Irrigation Department to release 190 736 million cubic feet of water from left right canals from Madhyam Project dhule news)

वाडी-शेवाडी मध्य प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी अवर्तन सोडण्याची मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, ज्येष्ठ नेते डी. आर. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिह गिरासे, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ दीपक बोरसे यांनी जिल्हाधिकारी जयश शर्मा यांच्याकडे केली होती.

त्यावरून शुक्रवारी जिल्हाधिकारी शर्मा यांनी वाडी-शेवाडी मध्य प्रकल्पातून शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीकाठावरील गावांसाठी पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्यातून १९०.७३६ दक्षलक्ष घनफूट पाणी तालुक्यातील २५ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. डाव्या कालव्यावरील २१ गावांसाठी १४५.३७ व उजव्या कालव्यावरील चार गावांसाठी ४५.३६ दशलक्ष घनफूट पाणी एकाच आवर्तनात सोडण्यात येणार आहे.

अटी व शर्तींचे काटेकोर पालन करा!

जिल्हाधिकारी शर्मा यांनी आदेशात म्हटले आहे, की आवर्तन सोडण्यापूर्वी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवरील फळ्या काढल्याबाबत व पुन्हा टाकून पाणी अडविले जाणार नाही. याबाबत धुळे पाटबंधारे विभागाने संनियंत्रण करावे, तसेच पाणी अडविले किंवा अनधिकृत उपसा होणार नाही याबाबत आपल्या आधिपत्याखालील अधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबतचे संनियंत्रण शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व गटविकास अधिकारी देवीदास देवरे यांनी करावे. आवश्यक असल्यास पाणी सोडण्यापूर्वीच पोलिस बंदोबस्ताची मागणी करून परिपूर्ण नियोजन करावे.

पोलिस अधीक्षकांनी पाणी सोडल्यानंतर नागरिकांकडून पाणी अडविणे, चोरी/कॅनॉल फोडणे, वीजपंपाद्वारे पाणीगळती करणे यांसारखे अनुचित प्रकार न होण्यासाठी गरज असल्यास पोलिस बंदोबस्त देणे, पोलिस गस्ती वाहनाने वेळोवेळी भेटी देणे, याबाबत मदत करण्यासाठी अधीनस्त पोलिस ठाण्याचे प्रभारी यांना आदेशित करावे.

पाणी तालुक्यातील गावांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता, पोलिस निरीक्षक, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता व तलाठी/ग्रामसेवक यांची संयुक्तीकरीत्या राहील. पाणीपट्टीची रक्कम ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पाटबंधारे विभागास जमा करून घेऊन त्यानंतरच पाणी आवर्तन सोडण्याची कार्यवाही करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडजवळ भीषण आग

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

T20 WC, IND vs SA: अक्षर पटेलला संधी नाहीच; दक्षिण आफ्रिका संघात तब्बल ४ बदल; Super-8 सामन्यासाठी पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT