nashik fire brigade.jpg
nashik fire brigade.jpg 
उत्तर महाराष्ट्र

गंभीर गुन्ह्यात पंच देण्यास अग्निशमन दलाने दिला नकार....अन् पोलीसांनीच केली दलाविरुध्द तक्रार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पोलिसांनी मागणी करूनही गंभीर गुन्ह्यात पंच देण्यास नकार दिल्याने अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच कर्मचारी एन. बी. तोरमल यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. अशा प्रकारची तक्रार दाखल होण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे. 

पोलिसांना शासकीय पंचाची आवश्‍यकता भासली...पण...

खून, आत्महत्या किंवा विविध लहान-मोठ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी शासकीय कर्मचारी, अधिकारी पंच म्हणून देण्याचे शासकीय आदेश आहेत. पोलिसांना आवश्‍यकता भासल्यास त्यांच्याकडून विविध शासकीय विभागाकडून कर्मचाऱ्याची शासकीय पंच म्हणून मागणी केली जाते. शनिवारी (ता. 7) जुने नाशिक परिसरात विवेक शिंदे याचा खून झाला. गंभीर गुन्हा असल्याने भद्रकाली पोलिसांना शासकीय पंचाची आवश्‍यकता भासली. मध्यरात्री शासकीय विभाग बंद असल्याने त्यांनी अग्निशमन विभागास त्यांचे कर्मचारी पंच म्हणून देण्याचे पत्र देऊन मागणी केली. अग्निशमन कार्यालयात त्यावेळी नियुक्तीस असलेले एन. बी. तोरमल यांनी पत्र न घेता वरिष्ठ अधिकारी संजय बैरागी यांची परवानगी घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. कर्मचारी संख्येचा अभाव असल्याने त्यानी पंच देण्यास नकार दिला. लोकसेवकास सहाय्य देण्यास जाणीवपूर्वक टाळल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वराडे यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांत  बैरागी आणि तोरमल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. 

पोलिस आयुक्तांना पत्र 
अग्निशमन विभागातील अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. शिवाय नवीन भरतीही झाली नाही. कर्मचारीसंख्या अपुरी आहे. एका बंबासह कमीत कमी चार कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असते. तीन सत्रांतील नियुक्ती बंद करून 12 तासांच्या दोन सत्रांत कर्मचाऱ्यांची विभागणी केली आहे. अशा वेळेस पंच म्हणून कर्मचारी देण्यास शक्‍य होत नाही. कर्मचारी भरती होत नाही तोपर्यंत आपत्कालीन व आणीबाणी सेवेचा विचार करता अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्याना पंच म्हणून न बोलविण्याचे सर्व पोलिस ठाण्यांना आदेश देण्याबाबतचे पत्र मुख्य अग्निशमन विभागाकडून पोलिस आयुक्तांना देण्यात आले. त्याची प्रत महापालिका आयुक्तांनाही देण्यात येणार असल्याची माहिती  बैरागी यांनी दिली.  

...म्हणून पंच देण्यास नकार

विल्होळी आणि शहरात दोन ठिकाणांहून आगीचे कॉल आले होते. बरेच कर्मचारी कॉलवर गेलेले होते. केवळ चार कर्मचारी त्याठिकाणी नियुक्तीस होते. त्यातील एक कर्मचारी टेलिफोन ऑपरेटर होते. त्यातून पोलिसांना दोन कर्मचारी पंच म्हणून दिले असते आणि कॉल झाला असता, तर कोणते कर्मचारी गेले असते म्हणून पंच देण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.- संजय बैरागी, वरिष्ठ अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT