Aadhar Card : जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आधार नोंदणीस १० वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच आधारकार्ड काढताना आपले ओळखीचा पुरावा (पीओआय) व पत्त्याचा पुरावा (पीओए) संबंधी कागदपत्र ऑनलाइन सादर केले नाहीत.
अशा नागरीकांनी आपले आधार अद्ययावत करण्यासाठी ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा संबंधी कागदपत्रांसह जवळच्या आधार केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.(Manisha Khatri statement of Update Aadhar Card to citizen nandurbar news)
केंद्र शासनाच्यावतीने देशभर नागरिकांच्या आधारकार्ड नोंदणीची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली असून बहुतांश नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडील अधिसूचनेनुसार १६ ‘क’ कागदपत्रांच्या अद्ययावत नियमावलीनुसार आधार कार्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे.
प्रत्येक नागरिकास दर दहा वर्षांनी आधार अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले असून ज्या नागरिकांना आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. अशा नागरीकांनी आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधारकार्डाशी ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा ऑनलाइन अद्ययावत करून घेणे आवश्यक आहे.
शासनाने आधारकार्डाशी संबंधी कागदपत्र ऑनलाइन अद्ययावत करणेसाठी ५० रुपये शुल्क निर्धारित केले आहे.
यासाठी स्थानिक ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, सरपंच, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आधार नोंदणीस १० वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या आधारकार्ड धारकांना त्यांचे कागदपत्र ऑनलाइन अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.