coronavirus second wave 
उत्तर महाराष्ट्र

दुसरी लाट अधिक धोकादायक; सहज घेऊ नका! 

रमाकांत घोडराज

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाची सध्याची लाट ही पहिल्या लाटेपेक्षा धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी एवढ्या सहजतेने वागू नये. लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून आवश्‍यक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नागरिक जोपर्यंत संवेदनशीलपणे, जबाबदारीने वागत नाहीत, तोपर्यंत त्याला अर्थ नाही, कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे; अन्यथा स्थिती अधिक स्फोटक बनेल व त्याला आपण सर्वच जबाबदार राहू, असा सूर शनिवारी (ता.२७) महापालिकेत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत उमटला. 
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवारी (ता.२७) महापालिकेत आढावा बैठक घेतली. महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजीज शेख, स्थायी समिती सभापती संजय जाधव, डॉक्टर, वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. डॉ. भामरे म्हणाले, की तीन-चार महिन्यांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या अतिशय कमी होती. मात्र, ढिलाईमुळे पुन्हा बाधित वाढत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट जास्त धोकादायक आहे. त्यामुळे खडबडून जागे व्हायची वेळ आली आहे. रुग्णालयांमध्ये खाटा मिळाव्यात, यासाठी नागरिक आम्हाला फोन करतात. श्री. भाऊसाहेब हिरे मेडिकलमध्येच सर्व रुग्ण जातात. त्यामुळे तेथे भार पडला आहे. यावर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

लग्न समारंभातूनही प्रसार 
लग्न समारंभामुळे कोरोनाचा प्रसार जास्त होत असल्याचे नमूद करत प्रशासनासह लोकप्रतिनिधी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिकांना गांभीर्य नाही. त्यामुळे यापुढेही नागरिकांनी समंजसपणे विचार केला नाही तर हाहाकार उडेल व त्याला सर्वच जबाबदार असतील असा इशाराही डॉ. भामरे यांनी दिला. गंभीर स्थिती निर्माण झाली तर कठोर निर्बंध लागतील. त्यामुळे सण-उत्सवही घरातल्या घरात साजरा करा असे आवाहन डॉ. भामरे यांनी केले. 

लढाई लवकर संपणारी नाही 
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, की कोरोना विषाणूचे पाच प्रकार सध्या अस्तित्वात आहेत. हा विषाणू पहिल्या आठवड्यात लक्षणेच दाखवतच नाही. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक व विविध व्याधी असलेल्या नागरिकांसाठी कोरोना धोकादायक होता. मात्र आता ३०-४० वयोगटासाठीही हा विषाणू धोकादायक बनला आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीमुळेही संसर्ग वाढल्याचे ते म्हणाले. ही सर्व परिस्थिती पाहता कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपणारी नाही. त्यामुळे थकून चालणार नाही, अधिक सजग राहण्याची गरज श्री. यादव यांनी व्यक्त केली. 

संपादन - राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT