गणपूर (ता. चोपडा) : पूर्वी मराठी शाळेत पाल्य गेला की काही दिवस किंवा महिन्यात तो बाराखडी आणि मुळाक्षरे पाटीवर गिरवीत असे. पालक, आई, वडील यांना त्या गोष्टीचे फार अप्रूप वाटत असे. आज ही त्यांच्या बोलण्यात बाराखडी हाच शब्द असेल ? पण थोडं थांबा, कारण बाराखडी कधीच चौदाखडी झालीय !
पूर्वी ज्युनिअर केजी, सिनिअर केजी हे वर्ग नव्हते. बाळ सहा वर्षाचे झाले की त्याचे थेट पहिलीत नाव दाखल होत असे. जन्मदाखल्या शिवाय प्रवेश आडत नसे. आणि मराठी शिक्षणात बाराखळी, मुळाक्षरे आणि पाढे यावर जास्त जोर असे. आता काळ बदलला तसा अभ्यासक्रमही बदलला. मुलांची ग्रास्पिंग पॉवर वाढली. तसाच एक बदल झाला बाराखडीही आता चौदाखडी झाली आहे.
मुळाक्षरे तशी २६ आणि त्यांचा उच्चार करताना क, का नुसार सुरवात होत असे. १२ स्वर असत आता त्यात कॅ, आणि कॉ ची भर पडली असून ती चौदा झाल्याने पूर्वीची बाराखडी कधीच चौदाखडी झाली आहे. ते अनेकांच्या लक्षातही आले नाही. मुळात अभ्यासक्रम नेहमी कालानुरूप बदलत असतो. शैक्षणिक धोरणातील बदल होत असताना शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणातून हे बदल लक्षात घेतांनाच पालकांनीही अशा बदलांची नोंद घेणे काळाची गरज बनली आहे. या नवीन बदलानुसार पहिल्या १२ अक्षरात आता २ अक्षरांची भर पडल्याने बाराखडी चौदाखडी झाली आहे. त्यानुसार हा बदल पूर्वीच्या क, का, कि, की, कु, कू ,के, कै, को, कौ, कं, का: मध्ये आता कॅ आणि कॉ ची भर पडल्याने १२ खडी आपोआपच १४ खडी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.