highway work 
उत्तर महाराष्ट्र

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांना तीन ठिकाणी ब्रेक 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : "मार्चअखेर शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल', "तरसोद फागणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचेही काम लवकरच वेग घेणार', अशी माहिती राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सादर केली होती. आज मात्र शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांची स्थिती पाहता तब्बल तीन ठिकाणी बंद पडले आहे. अनेक नाल्यावर पूल बांधणे बाकी असताना मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण होणे शक्‍य नाही.यामुळे "न्हाई'च्या अधिकाऱ्यांनी सभेत दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे जाणवत आहे. 


एप्रिल 2019 मध्ये कालिकामाता मंदिर ते खोटेनगरापर्यंत शहरातील महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे कामाला मंजुरी मिळाली. हैदराबाद येथील झांडू कंन्स्ट्रकशनने हे काम दिवाळीनंतर सुरू केले. काही महिने वेगात काम सुरू होते. मात्र सध्या प्रभात कॉलनी, गुजराल पेट्रोलपंप, दादावाडी समोरील बोगदा उभारणीचे काम बंद पडले आहे. केवळ बोगद्याचा पाया बांधून दोन- तीन फूट काम केले. नंतर ते काम बंदच पडले आहे. गुजराल पेट्रोलपंपाजवळ विद्युत तारांची अडचण होती. वीज कंपनीने त्या ताराही काढल्या. आता तरी बोगदाचे काम वेगात सुरू होण्याची गरज होती. मात्र तसे झालेले नाही. यामुळे नागरिकांना कच्च्या रस्त्यावरून जाताना धूळ, वाहतुकीची कोंडी, अपघातांना सामोरे जावे लागत आहे. 

धुळीचा अनेकांना श्‍वसनाचे आजार 
शहरातून जाणारा महामार्गावरून दररोज हजारो लहान मोठी वाहनांची वर्दळ असते. महामार्गाचे चौपदरीकरण करताना कंत्राटदाराने पर्याय म्हणून कच्चा रस्ता तयार केला. त्यावर प्रचंड धूळ चोवीस तास उडते. यामुळे वाहनधारक धुळीने माखून जातात. सोबत महामार्गाच्या बाजूला राहणाऱ्या घरांवरही धुळीचे थर साचले आहेत. धुळीमुळे अनेकांना श्‍वसनाचे विकार जडले आहेत. यामुळे चौपदरीकरणाचे काम रात्रंदिवस पूर्ण करून नागरिकांना अपघातापासून, धुळीच्या त्रासापासून वाचवावे अशी मागणी होत आहे. 

इच्छादेवीजवळ अर्धेकाम पूर्ण 
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आकाशवाणी चौकाकडून इच्छादेवीकडे जाणाऱ्या महामार्गाचे एकीकडेच अर्धेकाम झाले आहे. गुजराल पेट्रोल पंप ते मानराज पार्कपर्यंतच्या एका भागातील काम होऊन तो मार्ग वाहतुकीस सुरू झाला. मात्र जुना महामार्गाचा रस्ता नवीन कामासाठी उखडून ठेवला आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी कायम आहे. 

संथकामामुळे अपघात वाढले 
योगेश गालफडे
ः शहरातील महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. सर्वच ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा खोदून ठेवल्याने महामार्ग रुंद झाला आहे. कंत्राटदाराने अगोदर एकाकडील पूर्ण बाजूने काम करावे, नंतर दुसऱ्याबाजूने केले तरच वाहतुकीची कोंडी टाळता येईल. 
 
सायंकाळी वाढते वर्दळ 
नरेंद्र सोनवणे
ः राष्ट्रीय महामार्ग सहा नेहमी वर्दळीचा असतो. सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान महामार्गावर मरणाची गर्दी असते. महामार्गावरील गर्दी, वाहतुकीची कोंडी भयावह आहे. महामार्गाने जाणारे जीवमुठीत धरून जातात, अनेकांचे अपघात होतात. मात्र अधिकाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही, हीच खंत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: "दारू पाजून कट रचवला"; जरांगे पाटील हत्याकट प्रकरणात नवा ट्विस्ट! अटक आरोपीच्या पत्नीचे धक्कादायक आरोप

Uddhav Thackeray : सरकार तुमच्या तोंडाला पाने पुसतंय, महायुतीला व्होटबंदी करा; उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आवाहन

Nashik Crime : नाशिक: ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले! 'काठे गल्ली' सिग्नलजवळ ६.५ ग्रॅम एमडीसह चौघे अटकेत

Congress Leader Kolhapur : कोल्हापुरात काँग्रेस नेत्याचा बंगला फोडला, पत्नीवर धारधार शस्त्राने वार; कुरिअर बॉय असल्याचा बहाण्याने रोकड लुटली

चाकणकरांवर टीका, पक्षानं धाडली नोटीस; रूपाली ठोंबरे म्हणाल्या, वेळ खूपच कमी

SCROLL FOR NEXT