rane patil 
उत्तर महाराष्ट्र

राणे शिवसेनेमुळेच मुख्यमंत्री बनले...आणि रस्त्यावर ही आले ः मंत्री गुलाबराव पाटील 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः शिवसेनेची सत्ता आल्यावर शिवसेनेच नारायण राणेना मुख्यमंत्री करून त्यांना मोठे केले. त्यानंतर सेना सोडली आणि त्यांना शिवसेनेच रस्त्यावर आणले. त्यामुळे त्यांचे नाते प्रेमाचे असल्याचा शाब्दीक टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना लगावला. 

सद्या देशात "कोरोना' विषाणूचा फैलाव वाढत असून चितेंची बाब असून देशावर संकट आलेले आहे. अशा परिस्थीत सर्वांनी एकत्र येवून लढा दिला पाहिजे. परंतू अशा परिस्थीती काही राजकारणी राजकारण करत आहे. त्यात नाराणय राणे सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची भेट घेऊन कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यात राज्यसरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर आज घेतांना शिवसेनेचे मुलूकमैदान तोफ तसेच पाणीपुरवठा व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंचा खरपुस समाचार घेतला. ही वेळ राजकारण करण्याची नसून आपत्ती काळात 
सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे मत व्यक्त केले. 


राजवट त्यांनी गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये आणावी 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव केवळ महाराष्ट्रातच आहे असे काही नाही तो संपूर्ण जगात आहेत. सर्वत्र या विषांणूमुळे कहर आहे. मात्र राणेंना महाराष्ट्रातच कोरोना दिसत आहे. गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली येथे देखील कोरोना आहे तेथे देखील त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करावे असा टोला राणेंना मंत्री पाटील यांनी लगावला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT