loan 
उत्तर महाराष्ट्र

ऑगस्ट संपला तरी पीककर्जाची बोंबाबोब 

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्ह्यात पीककर्जासाठी शेतकऱ्यांना अजूनही बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. कोरोनाचे कारण सांगत अधिकारी चालढकल करत आहेत. जिल्हा प्रशासनही याप्रश्नी कडक भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरींच्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. तसे निवेदन जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. 
निवेदनात म्हटले आहे, की राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकरींना वेळेवर पीककर्ज उपलब्ध न करुन देण्याच्या भुमिकेमुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे. सद्या परिस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. कर्ज वाटपाच्या योजनेला एकप्रकारे केराची टोपली दाखवून राष्ट्रीयकृत बँकांनी मनमानी चालविली आहे. पीककर्ज जुलैअखेर मिळणे अपेक्षित होते. परंतु कोरोनाचे कारण पुढे करुन बहुतेक बँक अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला. जुलै महिन्यातच शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न करणाऱ्या बँकांवर फौजदारी खटले दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले होते. परंतु त्याची कुठलीही अंमलबजावणी नंदुरबार जिल्ह्यात होताना दिसत नाही. ऑगस्ट संपला तरी बहुतांश शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेले नाही. सतत पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे नगदी पिकांची स्थिती वाईट झाली आहे. कपाशी व मिरचीची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पावसामुळे पिकांचे पंचनामे त्वरित सुरु करावेत, पीक विमा मिळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत. शेतकऱ्यांच्या समस्येविषयी प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : नवीन वर्षाची सुरुवात हुडहुडीने ! महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

तरुणांनो तयारीला लागा, पोलिस भरतीची फेब्रुवारीपासून मैदानी! राज्यात एका पदासाठी ११३ उमेदवार; सोलापूर शहरात जागा ७९ अन्‌ अर्ज ४१५१; बँड्‌समनसाठी एक तृतीयपंथी

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिकासाठी आता बाह्य परीक्षकांमध्ये अदलाबदल; बोर्डाकडून पहिल्यांदाच मोठा बदल; शिक्षणाधिकाऱ्यांची पथके करणार पडताळणी

Panchang 31 December 2025: वर्षाच्या शेवटच्या दिवशी विष्णुसहस्रनामस्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

महाबळेश्वर हादरलं! कंटेनरमध्‍ये गुदमरून दोघांचा मृत्‍यू; मजुरांनी थंडी घालवण्यासठी शेगडी पेटवली अन् विपरीत घडलं..

SCROLL FOR NEXT