Crop Insurance Scheme 
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात ११ हजार ८८६ शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत समावेश

मृग नक्षत्राने पाठ फिरविल्यापासून जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन उशिरानेच झाले.

सकाळ वृत्तसेवा

जुलैमध्येही समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलैअखेर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पाऊस नियमितपणे येईल या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली.

तळोदा : यंदाच्या खरिपात तालुक्यातील केवळ २०२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा (Prime Minister's Crop Insurance Scheme) घेतला असून, जिल्ह्यातून मात्र ११ हजार ८८६ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यातून जिल्ह्यातील १२ हजार १९३ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. त्यात जिल्ह्यात पावसाच्या कालावधीत खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटल्याने जिल्हा प्रशासनाने नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यात सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आता पुन्हा ३० तारीख उजाडूनही जिल्ह्यात पावसाचा मागमूस दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या (Farmers) तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.


यंदाच्या खरिपात सुरवातीपासूनच शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मृग नक्षत्राने पाठ फिरविल्यापासून जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन उशिरानेच झाले. त्यातही संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलैमध्येही समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलैअखेर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पाऊस नियमितपणे येईल या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. त्यात मूग, उडीद, कापूस, मका, भात, तूर, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, बाजरी अशा खरिपाच्या पिकांची पेरणी झाली. मात्र पिकांची वाढ होण्याच्या कालावधीत पुन्हा पावसाने ओढ दिली. त्यातून अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली, असे असले तरी खरिपाच्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ती जिवापाड जपली आहे.
त्यात जिल्हा कृषी कार्यालयाने नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यांतील कापूस, सोयाबीन व भात या अधिसूचित पिकांची नजरअंदाजाने एकूण पेरणी क्षेत्रापैकी पाच टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, विमा कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधींनी केले आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यातून पाऊस केव्हा होणार, याचीच शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.


पीकपद्धतीत बदलाची गरज
तळोदा तालुक्यात बागायती शेती कूपनलिकेच्या अर्थात, भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. त्यात एक पीक पद्धतीने शेती मोठ्या प्रमाणात होत असल्याने व भूगर्भातील पाणी देण्याची सोय असल्याने खरीप हंगामात पीकविमा योजनेत सहभाग कमी दिसत असल्याचे बोलले जाते. एकीकडे पावसाच्या कालावधीत खंड पडल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. तर दुसरीकडे भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे तालुक्यात भूगर्भातील पातळीचे सर्वेक्षण होऊन शेतकऱ्यांमध्ये पीकपद्धतीत बदल होण्यासाठी जाणीवजागृतीची गरज असल्याचे बोलले जात आहे.


प्रधानमंत्री पीकविमा योजनेत तालुकानिहाय सहभागी शेतकरी
नंदुरबार- ६००२
नवापूर-७९५
अक्कलकुवा-६९२
शहादा-१३२३
तळोदा-२०२
अक्राणी-२८७२
एकूण-११८८६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT