शहादा : सुसरी धरण (Susri Dam) पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे धरणातील आवक ही वाढत आहे. धरणाची वाढती पाणी पातळी लक्षात घेता. दोन वक्राकार दरवाजे ५० सेंटिमीटरने उघडले असून त्यातून दोन हजार ४७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोमाई नदीपात्रात होत आहे. सुसरी धरणातील पाण्याच्या येवा लक्षात घेता आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग सोडावा लागू शकतो. यासाठी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा (Alert) इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
यंदा जून, जुलै महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबरला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे येणारा खरीप शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरेल अशी आशा लागली आहे.तालुक्यातील ब्राम्हणपुरी, होळमोहिदा, प्रिंप्री, लोणखेडा, भागापूर, जवखेडा, आवगे जुनवणे, सुलवाडा, सुलतानपूर आदींसह गोमाई नदीचा परिसरात मोठ्या प्रमाणावर बागायती शेती केली जाते. त्यात केळी,ऊस, पपई हे मुख्य पीक येथील शेतकरी घेतात.
येथील शेतकऱ्यांची मुख्य मदार सुसरी धरणावर असल्याने गेल्या महिन्यात पाण्याची पातळी खालावली होती परंतु आता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाचे दोन वक्राकार दरवाजे ५० सेंटिमीटरने उघडले असून त्यातून दोन हजार ४७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.