उत्तर महाराष्ट्र

नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचा पिच्छा सोडेना; तूर पिकाला लागली उभळी 

योगीराज ईशी

कळंबू : कळंबू परीसरातील शेतक-यांचा अवकळा दिवसा गणीत वाढत आहेत.हाता तोंडाशी कांदा, मका, सोयाबीन पीकाचा शेतातच चिखल झाला.शासनाने किचकट नियमावली लावीत मदती पासुन दुरच ठेवल्याच्या तक्रारी दिल्या.परंतु काहिच परीणाम नाही झाला.आता शेतातील बहरून आलेल्या उभ्या तुर पीकाला उभळी लागल्याने अनेक शेतामध्ये खळेच्या खळे तुरीचे पिक वाळुन गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 


सारंगखेडा महसुल मंडळामध्ये कापूस पिकामध्ये अंतरपीक म्हणून तुर या द्विदल पीकाची पेरणी, लागवड जाते.यंदा अतिवृष्टी झाल्याने तुर पिक चांगलेच बहरून आले.त्यामुळे अनेक शेतक-यांची मदार ही आता तुर पिकावर होती परंतु हल्ली बहुतांश शेतक-यांच्या शेतातील बहरलेल्या तुर पिकावर उभळी हा रोग आल्याने खळेच्या खळे तुर पिक वाळुन गेले आहे.आधीच निसर्गासह कोरोना लाॅकडाऊन ने शेतकरी वर्ग हतबल झाला असतांना शेतातील पिकावरील वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीचा परीणाम शेतक-यांच्या मुळावर असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

  तुर पिकावर शेतकरी अवलंबून
अतिवृष्टी ने कापसाचे पीक हातचे गेल्याने अनेक शेतक-यांचे उत्पन्न हे तुर पिकावर अवलंबून होते.परंतु अचानक या पिकाला उभळी लागल्याने अनेकांच्या शेतातामध्ये व खळ्यात तुर पिक जागेवरच वाळत आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

Weather Update : कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस, अनेक भागात ‘कोसळधार’; आणखी 'किती' दिवस पावसाची शक्यता!

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून; मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली घटना

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT