उत्तर महाराष्ट्र

नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचा पिच्छा सोडेना; तूर पिकाला लागली उभळी 

योगीराज ईशी

कळंबू : कळंबू परीसरातील शेतक-यांचा अवकळा दिवसा गणीत वाढत आहेत.हाता तोंडाशी कांदा, मका, सोयाबीन पीकाचा शेतातच चिखल झाला.शासनाने किचकट नियमावली लावीत मदती पासुन दुरच ठेवल्याच्या तक्रारी दिल्या.परंतु काहिच परीणाम नाही झाला.आता शेतातील बहरून आलेल्या उभ्या तुर पीकाला उभळी लागल्याने अनेक शेतामध्ये खळेच्या खळे तुरीचे पिक वाळुन गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 


सारंगखेडा महसुल मंडळामध्ये कापूस पिकामध्ये अंतरपीक म्हणून तुर या द्विदल पीकाची पेरणी, लागवड जाते.यंदा अतिवृष्टी झाल्याने तुर पिक चांगलेच बहरून आले.त्यामुळे अनेक शेतक-यांची मदार ही आता तुर पिकावर होती परंतु हल्ली बहुतांश शेतक-यांच्या शेतातील बहरलेल्या तुर पिकावर उभळी हा रोग आल्याने खळेच्या खळे तुर पिक वाळुन गेले आहे.आधीच निसर्गासह कोरोना लाॅकडाऊन ने शेतकरी वर्ग हतबल झाला असतांना शेतातील पिकावरील वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीचा परीणाम शेतक-यांच्या मुळावर असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

  तुर पिकावर शेतकरी अवलंबून
अतिवृष्टी ने कापसाचे पीक हातचे गेल्याने अनेक शेतक-यांचे उत्पन्न हे तुर पिकावर अवलंबून होते.परंतु अचानक या पिकाला उभळी लागल्याने अनेकांच्या शेतातामध्ये व खळ्यात तुर पिक जागेवरच वाळत आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT