उत्तर महाराष्ट्र

थरारक ! भरधाव वाळूचे डंपर थेट घरात घुसले, गाढ झोपेतील दोन युवकांचा जागीच मृत्यू 

धनराज माळी

नंदूरबार : नंदुरबार साठी साक्री रस्त्यावरील जेल च्या पुढे असलेल्या नांदरखेडा गावा जवळ बंजारा समाजाच्या वस्तीतील घरात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूचा डंपर शिरल्याने झोपेत असलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या युवकांसाठी ही काळरात्र ठरली. या घटनेनंतर सकाळी दहाला बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी रास्ता रोको करून रोष व्यक्त केला. मात्र पोलिसांनी समजूत काढून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आले.

आवश्य वाचा-  ‘सभा के चारो और बम है’फडणवीसांच्या कार्यक्रमात आली धमकी आणि उडाली खळबळ ! 

याबाबत घटनेची माहिती अशी, नंदुरबार साक्री रस्त्यावर जेल च्या पुढे व नांदरखेडा गावाच्या फाट्याजवळ बंजारा समाजाची शेतातच घर आहेत. याठिकाणी रात्री हे कुटुंब झोपले असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूचा डंपर चालकाच्या ताबा सुटून हे डंपर त्या वस्तीतील घरात शिरले .घरांची मोडतोड करीत थेट घरात झोपलेल्या दोन युवकांचा बळी घेतल्यावरच हा डंपर त्या ठिकाणी थांबला.घटना घडताच चालकाने तेथून पलायन केले. रात्रीच्या अंधारात या कुटुंबाने आरडाओरड करिता आक्रोश केला. ही घटना वाऱ्यासारखी नांदरखेडा गावपरिसरात पसरली. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

बंजारा समाजाचा रास्ता रोको

घटनेची माहिती सर्वदूर पसरताच सकाळी परिसरातील बंजारा समाजातील नागरिकांच्या मोठा समुदाय घटनास्थळी जमला. त्यांनी त्या ठिकाणी रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांची समजूत काढली व कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले व कायदेशीर मार्गाने जावे ,कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले ,त्यानंतर समुदाय शांत झाला. या अपघातात प्रवीण बाबूलाल राठोड व विक्रम श्रावण जाधव यांचा मृत्यू झाला आहे.

अवैध वाळू वाहतूक कधी बंद होणार

अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने आत्तापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत ,मात्र वाळू वाहतूक सुरूच आहे .त्याच्यावर प्रशासनाच्याही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे .वाळू वाहतुकीच्या डंपरने केवळ या दोनच युवकांचा बळी घेतलेला नाही तर यापूर्वीही अनेक जणांचा बळी गेला आहे. आता तरी प्रशासन लक्ष देईल का ? असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT