banana
banana 
उत्तर महाराष्ट्र

बाजार समितीच्या आदेशाला व्यापाऱ्यांचा ठेंगा 

सकाळ वृत्तसेवा

रावेर : येथील बाजार समितीने केळीचे भाव ६६० रुपये क्विंटल असे किमान जाहीर करूनही असंख्य व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या या आदेशाला ठेंगा दाखवत केवळ ३०० रुपये क्विंटल भावाने केळी खरेदी सुरू ठेवली आहे. मात्र, याबाबत एकही केळी उत्पादक शेतकरी तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याने बाजार समितीची स्थिती अगतिक झाली आहे. काही मोजक्याच व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे निर्देश पाळून केळीला ६०० रुपये भाव दिला. 
मागील आठवड्यापर्यंत बाजार समितीचे केळी भाव १०७० रुपये फरक १० रुपये असे एकूण ११३० रुपये क्विंटल असे होते. मात्र, प्रत्यक्षात व्यापारी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० ते ४५० रुपये भाव देत होते. आपण भाव खाली आणल्यास व्यापारी आणखीच कमी किमतीत केळी मागतील या भीतीने बाजार समितीने ११३० रुपये भाव कायम ठेवले होते. परंतु कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर बाजार समितीने केळीचे वस्तुनिष्ठ भाव जाहीर केले. केळीचा उत्पादन खर्च भरून निघेल याचा विचार करून ६०० रुपये क्विंटल फरक १० रुपये असे एकूण ६६० रुपये नवती केळीचे भाव जाहीर करण्यात आले. पिलबाग आणि कांदेबाग केळीसाठी ५०० रुपये क्विंटल फरक १० रुपये असा एकूण ५६० रुपये क्विंटल आणि वापसी केळीसाठी २०० रुपये क्विंटलला भाव जाहीर करण्यात आला आहे. 
मात्र, ठिकठिकाणी कानोसा घेतला असता अधिकांश व्यापारी वर्गाने बाजार समितीच्या या किमान भावाला ठेंगाच दाखवल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची केळी आज ३०० ते ३५० रुपये क्विंटल या दराने खरेदी करण्यात आली. अर्थात या नगण्य भावाबद्दल कोणताही केळी उत्पादक शेतकरी बाजार समितीकडे संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यास धजावत नसल्याने बाजार समितीची स्थिती अगतिक झाली आहे. 

ट्रक चालकांना शिधा देण्याचा प्रस्ताव 
शेतकऱ्यांनी आपली केळी कापण्याची घाई करू नये आणि व्यापारी बांधवांनी शेतकऱ्यांना किमान उत्पादनखर्च भरून निघेल इतका भाव देण्याचे आवाहन बाजार समितीने केले आहे. दरम्यान, आज बाजार समितीच्या झालेल्या बैठकीत पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. केळी घेऊन उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रक्स चालकांना रस्त्याने जेवण मिळण्यात अडचणी असल्याने त्यांना शिधा देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे सभापती श्रीकांत महाजन यांनी सांगितले. आज झालेल्या या बैठकीत सभापती श्रीकांत महाजन यांच्यासह संचालक डॉ. राजेंद्र पाटील, डी. सी. पाटील, पितांबर पाटील, योगेश पाटील, सचिव गोपाळ महाजन, शेतकरी अतुल महाजन, जितेंद्र पवार आदींनी चर्चेत सहभाग घेतला. 

काही व्यापाऱ्यांनी दिला बोर्ड भाव 
बाजार समितीच्या आणि काल (ता ३) सावदा येथे झालेल्या अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या बैठकीतील आवाहनास प्रतिसाद देत काही व्यापारी बंधूंनी केळीला ६०० रुपये क्विंटल भाव दिल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. भागवत चौधरी (कुंभारखेडा), दगडू कोळी (मस्कावद), डी. के. ॲड सन्स (फैजपूर) यांनी दिलीप पाटील (उटखेडा), अतुल महाजन (कुसुंबा), विनोद पाटील (तांदळवाडी), पंकज होले (मस्कावद) आदी शेतकऱ्यांच्या केळीला ६०० रुपये भाव दिल्याबद्दल बाजार समितीने त्यांचे अभिनंदन 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT