break for the economy 
उत्तर महाराष्ट्र

खानदेशातील अर्थकारणाला बसणार ब्रेक; हे आहे कारण 

रमेश पाटील

सारंगखेडा (नंदुरबार) : कार्तिकी एकादशीनंतर यात्रांना सुरुवात होते. यात्रा हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या खानदेशातील लाखाहून अधिक व्यावसायिकांचे अर्थकारणावर यात्रांचा प्रभाव असून समाजव्यवस्था टिकवून ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. सद्य परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता असताना यात्रा भरणार की नाही याविषयी कोणीही नेमकेपणाने सांगू शकत नसल्याने याबाबत संभ्रम कायम आहे. 

यंदा कोरोनामुळे यावर्षी यात्रा भरली नाही, तर आगामी वर्षभर आर्थिक व्यवस्था कशी करावयाची असा प्रश्‍न व्यावसायिकांना पडला आहे. कोरोनाचा संसर्ग येत्या काही दिवसांत कमी झाला तर कार्तिकी नंतर भरणाऱ्या यात्रोत्सवांचा विचार होऊ शकेल. अन्यथा गर्दीमुळे संसर्ग पुन्हा पसरू नये यासाठी धोका न पत्करता यात्रोत्सव रद्द होऊ शकतो. 

अद्याप यात्रा संदर्भात बैठक नाही 
दरवर्षी कार्तिकीनंतर महिन्याभरात खानदेशातील सर्वांत मोठी यात्रा सारंगखेडा येथे भरते. यात्रे बरोबर गेल्या पाच वर्षापासून चेतक फेस्टिव्हल भरविला जातो. याच्या नियोजनासाठी तीन महिने अगोदरच जिल्हास्तरीय बैठक होत असते. कोरोनामुळे सारंगखेडा यात्रोत्सवानिमित्ताने कोणतीही बैठक आतापर्यंत झाली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. येथील यात्रोत्सवाला साडे चारशे वर्षाची परंपरा आहे. येथे देशाच्या कानाकोपऱ्यांतुन घोडे खरेदी, विक्रीसाठी अश्वप्रेमी येतात. यात्रेत व्यापारासाठी देशभरातून व्यावसायिक येतात. यंदा कोरोनामुळे यात्रोत्सव होणार का याबाबत व्यापाऱ्यामध्ये संभ्रम आहे. 

खानदेशातील प्रसिद्ध यात्रा 
खानदेशात सारंगखेडासह विखरण, शिरपूर, आमळी, बोरीस, तळोदा, शिंदे, मंदाणे, मुडावद, बहादरपुर, अमळनेर, धुळे, चोरवड, वायपूर आदी ठिकाणच्या यात्रा प्रसिद्ध आहेत. याशिवाय नवरात्र , चैत्र महिन्यात एकवीरादेवी, पेडकाईदेवी, मनुदेवी, बिजासनीदेवी, धनदाईदेवी, इंदाशीदेवी, धनाई पुनाई देवी, आशापुरीदेवी, भटाईदेवी आदी देवींच्या यात्रा ही प्रसिद्ध आहेत. 
 
यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात जनसमूह एकत्र येतो. त्यामुळे संक्रमण वाढण्याची भिती असते. यात्रोत्सवाला परवानगी देण्यासाठी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे लागेल. याबाबत शासन निर्णय घेईल. 
-मिलिंद कुळकर्णी, तहसीलदार, शहादा 

मार्च महिन्यापासून यात्रोत्सव, आनंदमेळा बंद झाल्यामुळे फिरते व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र वगळता गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात आनंद मेळा भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रात परवानगी देण्यात आलेली नाही. संघटनेमार्फत परवानगीसाठी मंत्रालयात निवेदन दिले आहे. 
- देवेंद्र चौधरी, अध्यक्ष, यात्रा व्यापारी संघटना 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

शेतकरी दुष्काळाने होरपळतोय, नेते खातायत सुकामेवा, आढावा बैठकीत काजू बदामचा नाश्ता

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

SCROLL FOR NEXT