mulching paper use in the field. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : बोरद परिसरातील शेतकऱ्यांची आधुनिक शेतीकडे वाटचाल; बियाण्याऐवजी रोपलागवडीकडे वाढता कल

Nandurbar News : परिसरात शेतकरी सध्या आधुनिक शेतीकडे वळाल्याचे चित्र दिसत आहे. येथील शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग राबविताना नजरेस पडत आहे.

सकाळ वृत्तसेवा

बोरद : परिसरात शेतकरी सध्या आधुनिक शेतीकडे वळाल्याचे चित्र दिसत आहे. येथील शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग राबविताना नजरेस पडत आहे. परिसरात शेतजमीन मोठ्या प्रमाणावर असल्याने व परिसरात पिकांच्या गरजेप्रमाणे पाणी उपलब्ध असल्याने ते टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग राबविताना सध्या नजरेस पडत आहेत. (Farmers in Borad area are moving towards modern agriculture)

पारंपरिक शेतीला बगल देत येथील शेतकरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तसेच संशोधनातून साकारल्या जाणाऱ्या आधुनिक शेतीकडे वळाल्याचे चित्र आहे. आधी शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी संपूर्ण शेत ओले करावे लागत होते; परंतु आता शेतकरी फक्त पिकांना पाणी कसे देता येईल याकडे आपले लक्ष वळवीत आहे.

जमिनीचा ओलावा टिकण्यास मदत

शेतकरी आपल्या शेतात पिकांची लागवड करण्यापूर्वी तणाचादेखील विचार करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर जमिनीत पाण्याचा ओलावा टिकून राहावा व वातावरणाचा कुठलाही परिणाम पिकावर होऊ नये या दृष्टिकोनातून आपल्या शेतामध्ये मल्चिंग पेपरचा वापर करताना दिसत आहे. बोरद परिसरात विविध रस्त्याने प्रवास करत असताना शेतशिवारात पाहिले असता मल्चिंग पेपरच्या माध्यमातून शेती होत असल्याचे आपल्याला सहज दिसून येते.

तापमान व आर्द्रता नियंत्रित

मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन वापरल्यामुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये चांगले उत्पन्न मिळत आहे. त्याचबरोबर पिकांच्या सोबतीने वाढणाऱ्या तणावरदेखील नियंत्रण राखता येत आहे. त्यामुळे तण काढणीवर होणारा शेतकऱ्यांचा खर्च यामुळे वाचत आहे. पेपरच्या आच्छादनामुळे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित होत असल्याने पीकवाढीला फायदा होत आहे.

त्याचबरोबर किडीचा प्रादुर्भाव होण्यापासून पिकाला वाचविता येत आहे. अतिरिक्त पाऊस झाला तरी त्याचा फारसा परिणाम उत्पादनावर होत नसल्यामुळे मल्चिंगचा वापर अधिक प्रमाणात परिसरातील शेतकरी करू लागले आहेत. (Latest Marathi News)

हेक्टरी ३२ हजार खर्च

मल्चिंग पेपर आच्छादनासाठी साधारणता ३० ते ३२ हजार रुपये हेक्टरी खर्च येतो. यासाठी शासनाची अनुदान योजनादेखील उपलब्ध आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना १६ हजार रुपयांपर्यंत हेक्टरी अनुदान मिळते. या योजनेला प्राप्त करून घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करावा लागतो. त्यामुळे या योजनेत अनेक शेतकरी सहभागीदेखील आहेत.

पिकाची निगा राखणे सोपे

मल्चिंग पेपरबरोबरच शेतकरी तयार रोपांवर अधिक भर देत आहेत. आधी बियाणे जमिनीत रोवून त्या बियाण्याच्या माध्यमातून पिकांची उगवण केली जात होती; परंतु आता शेतकरी तयार रोपांची लागवड करत असल्याने पिकांचा कालावधी काहीअंशी कमी होत आहे. रोपांच्या लागवडीतून पिकाची निगा राखणे शेतकऱ्यांना सोपे जात आहे.

रोपलागवडीतून मररोगावर नियंत्रण राखता येत आहे. त्याचबरोबर योग्य खते, तसेच विविध कीटकनाशके तसेच पोषक द्रवाचा वापर करून अधिक उत्पन्न मिळविता येते आहे. एकंदरीत परिसरातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहे आणि ते शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT