2689 crore to the country from fruit exports Nashik Marathi News 
नाशिक

फळांच्या निर्यातीतून देशाला २,६८९ कोटी! मागील वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांची घट 

अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फळांच्या निर्यातीतून देशाला दोन हजार ६८९ कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास तीन टक्क्यांची घट झाली आहे. जागतिक बाजारपेठेचा विचार करता भारत हा फळे उत्पादन करणारा प्रमुख देश मानला जातो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक संकटांशी मुकाबला करून देशातून इतर देशांत फळे निर्यात केली आहे.

निर्यात धोरणामुळे फटका

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी निर्यात धोरणामुळे जवळपास तीन टक्के निर्यातीला फटका बसला आहे. भारताने एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत पाच लाख सात हजार टन फळांची निर्यात केली असून, यातून देशाला दोन हजार ६८९ कोटींचे परकीय चलन मिळाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत दोन हजार ७५१ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. त्या तुलनेत यंदा तीन टक्के घट दिसून आली. भारतातून प्रामुख्याने द्राक्ष, आंबा, केळी, डाळिंब, संत्री यांसारखी फळे मोठ्या प्रमाणात निर्यात केली जातात. भारतातील हवामान विविध प्रकारच्या फळ उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळे सर्व प्रकारच्या फळांबरोबर कृषिमालही देशात उत्पादित होतो. आपल्याकडील निर्यातक्षम उच्च प्रतीचा माल उत्पादित होऊनही परदेशातील बाजारपेठांमध्ये पाठविण्यासाठी अनेक दिव्य संकटातून जावे लागते. उत्पादन वाढीबरोबर उत्पादित मालाचे विपणन होणे, हा उत्पादकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनत चालला आहे. 

संपूर्ण जगाला भाजीपाला व फळे पुरविण्याची ताकत

स्थानिक बाजारातील मागणीपेक्षा पुरवठा वाढल्यास बाजारभाव एकदम मातीमोल होतात. गेल्या काही वर्षांत लहरी हवामानाचा फटका या क्षेत्राला बसला असून, यातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘बुडत्याचा पाय खोलात’ या पद्धतीने समस्या वाढतच आहे. दर्जेदार उत्पादन घेणारे शेतकरी आहे; पण तयार झालेला माल विकण्याची यंत्रणा बेभरवशाची असल्याने उत्पादकाला स्थानिक बाजारपेठेत मातीमोल भावाने हा माल विकावा लागतो. त्यामुळे त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले जाते. संपूर्ण जगाला भाजीपाला व फळे पुरविण्याची ताकत एकट्या भारत देशात आहे. सरकारने निर्यातीबाबतचे धोरण बदलले पाहिजे, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. 

निर्यातीतून मिळालेले चलन 

- नऊ महिन्यांत पाच लाख सात हजार टन निर्यात 
- निर्यातीतून दोन हजार ६८९ कोटी रुपयांचे परकीय चलन 
- मागील वर्षीचे परकीय चलन दोन हजार ७५१ कोटी 
- यंदा निर्यातीत तीन टक्के घट 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT