Samruddhi Mahamarg News, Samruddhi Mahamarg benefits esakal
नाशिक

Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’ मुळे 50 कोटींच्या इंधनाची बचत

अजित देसाई

सिन्नर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठवडाभरापूर्वी लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावरून साठ हजार वाहने धावल्याचे रस्ते विकास महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले. नागपूर-शिर्डीदरम्यान, जालना, औरंगाबाद व शिर्डीपर्यंत थेट येणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे.

‘समृद्धी’मुळे शंभर किलोमीटर अंतर कमी झाल्याने सुमारे ५० कोटी रुपयांच्या इंधनाची आठवड्यात बचत झाली. शिवाय औरंगाबाद, शिर्डीपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत सहा तासांची बचत झाली आहे. तसेच पथकराचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे. (50 crore fuel Savings due to Samruddhi expressway)

समृद्धी महामार्गाचे मुंबई ते नागपूर अंतर ७१० किलोमीटर असून, त्यापैकी ५७० किलोमीटरचा नागपूर ते शिर्डी टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला. ‘समृद्धी’चे लोकार्पण झाल्यानंतर त्याचदिवशी दुपारी तीननंतर महामार्गावरून वाहनांची ये-जा सुरू झाली.

आठवडाभरात बहुतांश वाहने शिर्डी, औरंगाबाद व जालनापर्यंत धावली. औरंगाबाद, जालना येथूनही अंतर शंभर किलोमीटरने कमी झाले. दिवसाला सव्वासहा हजार वाहने नागपूर ते औरंगाबाद, शिर्डीदरम्यान धावली, असे महामंडळाच्या आकडेवारीतून दिसते. शंभर किलोमीटरच्या कमी झालेल्या अंतरानुसार दिवसाला सर्वसाधारणपणे सव्वासहा कोटींचे इंधन वाचले आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

शिर्डी ते नागपूरदरम्यानच्या पूर्वीच्या प्रवासाला बारा तास लागायचे. ही वेळ ‘समृद्धी’मुळे आता सहा तासांवर आली आहे. आठवड्यात धावलेल्या वाहनांची संख्या आणि प्रत्येक वाहनामागे पाच प्रवासी असे गृहीत धरल्यास रोज एक लाख ८७ हजार ५० तास व आठवडाभरात चौदांहून अधिक तासांचा वेळ वाचल्याचे दिसते. समृद्धी महामार्गावरून जाण्यासाठी शिर्डी ते नागपूर या टप्प्यातील अंतरात ‘लाइट वेट’ आणि कार प्रकारातील वाहनासाठी एकेरी प्रवासासाठी जवळपास ९०० रुपये टोल द्यावा लागणार आहे. मुंबईपर्यंत थेट प्रवास करायचा झालास ही रक्कम बाराशे रुपये होते.

"रस्तेविकास महामंडळाने ठरवून दिलेल्या वेगमर्यादेनुसार वाहने चालवणे आवश्यक आहे. त्यातून वाहनास सरासरी ‘ॲव्हरेज’ मिळेल; अन्यथा अधिकचे इंधन लागेल. वेगमर्यादा न पाळल्याने वाहनांचा ‘मेंटेनन्स’ खर्च वाढेल. प्रवासास निघताना वाहनांची टायर तपासणी आवश्यक आहे. शंभर किलोमीटरला दहा मिनिटांची विश्रांती घ्यावी. अधिक वेगात वाहन चालवल्याने इंजिन गरम होऊन वाहन पेटू शकते. अथवा टायर फुटून अपघात होऊ शकतो. समृद्धी महामार्ग अजून अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी बंदिस्त झालेला नाही. त्यामुळे रस्त्यावर जनावरे येऊन अपघाताना निमंत्रण देतील."

- राजेंद्र साठे (वैजापूर-औरंगाबादचे गॅरेज व्यावसायिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Taxi: अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा, परिवहन मंत्र्याचे सायबर क्राईम विभागाकडे मागणी

BAN vs PAK 1st Test : बांगलादेशने घरी बोलवून पाकिस्तानला ठेचले; WTC मध्ये नाचक्की, शाहीन आफ्रिदीच्या संघाचा लाजीरवाणा पराभव

Kalyan Crime News : कल्याण हादरलं! 78 वर्षीय नराधम भोंदूबाबाचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पूजेच्या बहाण्यानं केलं काळं कृत्य

Mohol Accident : ईरटीगा कार आणि मालट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : नाशिक TCS प्रकरण; आरोपी तौसीफ अत्तारला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT