नाशिक : गडचिंचले (जि. पालघर) येथे जमावाच्या हल्ल्यात हत्या झालेल्या महंतांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या भाईंदर येथील वकिलाचा अपघाती मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवणच्या घाटात हा अपघात झाला.
अशी घडली घटना..
ऍड. दिग्विजय त्रिवेदी असे मृत वकिलाचे नाव आहे. ते त्र्यंबकेश्वर येथील महंतांच्या वतीने विश्व हिंदू परिषदेतर्फे डहाणू न्यायालयात बाजू मांडण्यासाठी येत असताना बुधवारी (ता. 13) सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर नजीक मृत त्रिवेदी त्यांच्या कार (एमएच 04, एचएम 1704)ने येत असताना मेंढवण पुलाजवळ त्यांच्या कारवरील ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृत त्रिवेदी मीरा-भाईंदर येथील बहुजन विकास आघाडीच्या लीगल सेलचे कामकाज पाहायचे.
तपासाला गती
दरम्यान, गडचिंचले महंतांच्या हत्याकांड तपासात संशयितांची संख्या 141 झाली असून, त्यात दहा जण अल्पवयीन भिवंडी येथील बालसुधारगृहात आहेत. अटकेतील 106 पैकी पाच जणांना न्यायालयाने 16 मेपर्यंत पोलिस कोठडी दिली असून, उर्वरित न्यायालयीन कोठडीतील 101 पैकी 40 जणांना तिसऱ्या गुन्ह्यात (आरोपींना अटक करताना हल्ला करणे) तपासासाठी 18 मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुधवारी आणखी सहा नवीन संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.