कडाक्याच्या उन्हामुळे आंब्याच्या डेरेदार झाडाखाली विसावलेली जनावरे.
कडाक्याच्या उन्हामुळे आंब्याच्या डेरेदार झाडाखाली विसावलेली जनावरे. esakal
नाशिक

नाशिक : उन्हाच्या तडाख्याने पशुपक्षी घायाळ

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : मार्च महिन्यापासून सूर्य आग ओकू लागल्याने उन्हाच्या असह्य झळा सहन कराव्या लागत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शहरासह संपूर्ण मोसम खोऱ्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याने अंगाची लाहिलाही होत आहे. त्यामुळे नागरीकांसह पाळीवप्राणी, पशुपक्षी कमालीचे बेजार झाले आहे. गॉगल, टोपी, स्कार्फ, रूमाल घेऊनच प्रत्येक जण घराबाहेर पडताना दिसत आहे. या वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही होत आहे.

वाढत्या उन्हापासून पशुपक्ष्यांची काळजी घेण्याचा सल्ला

उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्था यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यातून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा, कोल्ड्रिंक्स, लस्सी, लिंबू सरबत यांचा आधार घेताना दिसत आहे. मात्र वाढत्या उष्म्याने त्रस्त पशुपक्ष्यांचे काय? असा प्रश्न साहजिकच मनात येतो. वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणे पशुपक्ष्यांवरही होतो. त्वचारोग, हिटस्ट्रोकने त्यांची अवस्था बिकट होते. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता नागरिकांची अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही त्रास होत आहे. हिटस्ट्रोकमुळे पक्ष्यांना मूर्च्छितावस्थेचा सामना करावा लागतो. त्यामुळे वाढत्या उन्हापासून पशुपक्ष्यांची काळजी घेण्याचा सल्ला एकलहरे ( ता बागलाण ) येथील पशुवैद्यकीय अभ्यासक डॉ. नवल खैरनार यांनी यांनी दिला आहे.

पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका

माणूस व प्राण्यांमध्येही काही लक्षणे सारखी दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी सावलीत बसतात. मात्र सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशुपक्ष्यांना उष्म्यापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वा-यांचा त्यांना त्रास होतो. यामुळे त्यांना दम लागतो. तसेच हिटस्ट्रोक होतो.

"उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी यांना झाडांच्या सावलीचा आधार शोधावा लागत आहे. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणादरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य, समतोल असा आहार द्यावा. घराच्या बाहेर एखाद्या भांडय़ात पाणी ठेवावे. यामुळे पशुपक्षांची तहान भागू शकते."

-प्रा. के एन देसले, पर्यावरणप्रेमी, गोराणे

पशुपक्ष्यांची अशी काळजी घ्या

घरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो.

प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटक्यासाठी घेऊन जावे.

चिकन, मटण, मासे हे प्राण्यांचे आवडते खाद्यपदार्थ असले तरी उन्हाळ्यात हे पदार्थ त्यांना सारखे देऊ नयेत.

मांसाहारी पदार्थ पचण्यास जड असतात. त्यामुळे प्राण्यांना जुलाब, उलटीसारखे आजार होतात. उन्हाळ्यात प्राण्यांना खायला मोजकेच आणि पोषक आहार द्यावे.

प्राण्यांचे जेवण नेहमी ताजे असावे.

खिडकीवर, बाल्कनीत छोटेखानी भांडय़ात पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे. दोन-तीन तासांनंतर हे पाणी बदलावे.

पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.

आजारी पडलेल्या प्राण्यांना स्वत:च उपचार देण्याऐवजी पशुवैद्यकांचा सल्ला नेहमी घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT