pruning of Uttam Kotkar's vineyard. esakal
नाशिक

Nashik News : एप्रिल खरड छाटणीला वेग; शेतकऱ्यांकडून पुढील हंगामाची तयारी सुरु

सकाळ वृत्तसेवा

नैताळे (जि. नाशिक) : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्यात कांदा, द्राक्ष, ऊस, मका, सोयाबीन, टोमॅटो अशी नगदी पिके घेतली जातात. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून देणारे पीक म्हणून द्राक्ष आणि कांदा या पिकाकडे बघितले जाते. (April pruning is in full swing in vineyards niphad nashik news)

सध्या रब्बी हंगाम सुरू असून, तालुक्यात उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागांमध्ये एप्रिलच्या खरड छाटणीला वेग आला आहे.

द्राक्षबागेतल्या फळ छाटणी अवस्थे अगोदर सर्वात महत्वाची अवस्था म्हणजे खरड छाटणी होय. कारण खरड छाटणी व्यवस्थापन योग्यरित्या झाले, तरच फळ छाटणी कामकाजाला महत्व आहे. द्राक्षातील खरड छाटणीस फळ छाटणीचा पाया म्हणतात. थोडक्यात एप्रिल महिन्यात खरड छाटणी झाल्यानंतर बागेची योग्य ती काळजी घेतली जाते.

खरड छाटणीनंतर फुटून आलेल्या नवीन फुटीतील योग्य ती फुट राखणे, अतिरिक्त फुटींची विरळणी करणे, दोन फांद्या, काड्यांमधील योग्य अंतर राखणे, वेळेवर सबकेन करणे, सबकेनच्या पुढील शेंडा योग्य वेळी मारणे, काडीवरील पानांची संख्या नियोजन करणे, अन्नद्रव्यांचा व्यवस्थीत पुरवठा करणे, वेलीस रोग व किड यापासून नियंत्रणात ठेवणे, काडी पक्वता निर्मिती योग्य नियोजन करणे यासारख्या अनेक महत्वाच्या बाबींचा समावेश होतो.

यानंतर काडी चांगली परिपक्व होत जाते. काड्यांची परिपक्वता होण्यासाठी खरड छाटणीपासून साधारणतः १४० ते १५० दिवसांचा कालावधी लागतो. खरड छाटणीनंतर बागेत सुप्त घड निर्मितीसाठी व त्यांच्या विकासासाठी आवश्यक असे पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे असते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

द्राक्ष बागेतील एप्रिल खरड छाटणीनंतर केल्या जाणाऱ्या शेतीच्या अंतर्गत व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. कारण हा फळ छाटणीचा पाया समजला जातो. त्यामुळे यानंतरचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. द्राक्षपंढरीत द्राक्षाची काढणी युद्ध पातळी सुरू आहे. द्राक्ष काढणीनंतर साधारणतः १५ ते २० दिवसाच्या विश्रांतीनंतर खरड छाटणीला सुरवात केली जाते.

खरड छाटनीचे प्रचलित मजुरी दर (रूपयांत)

* छाटनी करुन बांधनी : २२०० ते ३०००

* पेस्ट करणे : १००० ते १५००

* काडी विरळणे, सबकेन डबल राऊंड : २५००

* शेंडा टाँपिग : १५००.

"द्राक्षवेलीवरील द्राक्ष काढणी झाल्यानंतर द्राक्षबागेला विश्रांती आवश्यक आहे. पण, या काळात द्राक्षबागेकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. या काळात खते, पाणी देण्याचे नियोजन करुन द्राक्षवेलीला सक्षम केले पाहिजे." -किशोर भास्कर बोरगुडे, द्राक्ष उत्पादक, नैताळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT