sarpanch-election.jpg
sarpanch-election.jpg 
नाशिक

ग्रामपंचायतीचा रणसंग्राम! बिनविरोधसह जिरवाजिरवीच्या राजकारणाला उधाण

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : गावगुंडीचा रणसंग्राम कोणत्या दिशेने जाणार, यासाठी अर्ज माघारीच्या सोमवारच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निवडणूक कोणत्या दिशेने जाणार, दुरंगी की तिरंगी याचे चित्र सोमवारी (ता. ४) स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काही गावांत बिनविरोध होऊन समझोता एक्स्प्रेस धावणार आहे. तर कुठे जिरवाजिरवीच्या राजकारणाला आतापासूनच उधाण आलेले दिसते. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची नांदी समजून काहींनी कंबर कसली आहे. 

समझोता एक्स्प्रेस की जिरवाजिरवी 

निफाड तालुक्यातील बहुप्रतिक्षित ६५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूकप्रक्रिया अर्ज दाखल होऊन माघारीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. दोन दिवस पॅनल निर्मितीबरोबरच बिनविरोधसाठी जोरबैठका होत आहे. निफाड मतदारसंघातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये बहुतांश ठिकाणी आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या समर्थकांमध्ये काट्याच्या लढती रंगणार आहेत. बिनविरोधसाठी गावातील किंगमेकर नेते हालचाली करीत आहेत. त्याला उंबरखेडसह काही गावांमध्ये प्रतिसाद मिळत आहे. उंबरखेडला वॉर्ड क्रमांक चारमधील ओबीसींच्या जागेवरील तिढा अद्याप कायम आहे. तो सुटल्यास स्थापनेनंतर ५२ वर्षांत प्रथमच उंबरखेड ग्रामपंचायत बिनविरोधचा इतिहास घडवेल. 

उद्या होणार चित्र स्पष्ट 

आहेरगाव, कारसूळ, बेहेड, दात्याणे, ओणे येथेही राजकीय संघर्ष थांबविण्यासाठी गावात शांतता, एकजूट राहण्यासाठी बिनविरोधचा रेटा वाढला आहे. निवडणुकीत पाण्यासारखा पैसा तर खर्च होतोच; पण जाती-पातीचे राजकारण, मुद्द्याची लढाई गुद्द्यावर येऊन वाद, भाऊबंदकी अशी दुफळी निर्माण होते. वर्षानुवर्ष निवडणुकीत ‘होऊ द्या खर्च’ची भूमिका घेणारे उमेदवार कर्जबाजारी होतात. प्रसंगी जमीन विकावी लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. याचा सारासार विचार करून गावातील ज्येष्ठ नागरिकांनी गावात एकोपा राहावा म्हणून बिनविरोध पर्याय पुढे ठेवला आहे. त्यावर किती गावांमध्ये याला प्रतिसाद मिळून सहमतीचे राजकारण दिसते, हे सोमवारी स्पष्ट होईल. दरम्यान, ओझर, नैताळे, लासलगाव, करंजगाव, सायखेडा, उगाव या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये तुल्यबळ लढती होणे अटळ असून, जिरवाजिरवीच्या राजकारणाला आतापासून ऊत आला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत मिनी मंत्रालयाची नांदी 

ग्रामपंचायत निवडणूक ही मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची नांदी ठरणार आहे. ते लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून काही जणांनी रणनीती आखली आहे. पक्षीय राजकारण ग्रामपंचायत स्तरावर जात नसल्याच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून गट बांधणी केली जात आहे. निफाड मतदारसंघातील ४५ म्हणजे अर्ध्या गावांमध्ये निवडणूक होत असल्याने तालुकास्तरावरील नेत्यांनी या रणसंग्रामात छुपे लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. ‘राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना’, असाच रांगरंग बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दिसतो. 

माघारीनंतर लगेच चिन्हवाटप, प्रचाराचा उडणार धुराळा 

४ जानेवारीला माघारीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीच्या आखाड्यातील सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पॅनल प्रचार प्रारंभाच्या सभा होतील. गावागावांत ऐन थंडीत प्रचाराचा धुराळा उडणार असल्याने ‘थंडी मे गर्मी का ऐहसास’, असे वातावरण राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांमध्ये दिसेल. ओझर व लासलगावच्या निवडणुकीचा निकाल काय लागतो, याची उत्सुकता जिल्ह्याला लागून आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT