bogus fertilizers and seeds sale on the radar of the police nashik marathi news 
नाशिक

बोगस खत-बियाणे विक्रीही पोलिसांच्या रडारवर - पोलीस अधीक्षक सचिन पाटील

विनोद बेदरकर

नाशिक : शेतकरी फसवणुकीचे प्रकार टाळण्याला ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च प्राधान्य दिले असून शेतकऱ्यांना फसविणाऱ्या व्यापाऱ्यासोबत बोगस बियाणे विक्रेतेही पोलिसांच्या रडारवर असणार आहे. नवनियुक्त पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज कोरोना नियंत्रण आणि शेतकरी फसवणूक हे ग्रामीण पोलिसांचे प्राधान्याचे विषय असतील असे स्पष्ट करीत, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी बोगस बियाणे -खत विक्रीत फसवणूक झाल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

पोलीस अधीक्षक पाटील आज पत्रकारांशी बोलत होते. नवनियुक्त अधीक्षकांनी शेतकरी फसवणूक टाळण्यालाच प्राधान्य राहील असे स्पष्ट केले. बोगस बियाणे आणि खते देऊन फसविले गेल्यास शेतकऱ्यांनी थेट १०९८ किंवा माझ्या ७७३८६००००१ या मोबाईलवर संपर्क साधा. अशा शब्दात शेतकऱ्यांना भरवसा दिला. शेतकरी फसवणूक प्रकरणी आतापर्यत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी १० कोटी रुपये परत मिळवून दिले. ७९ तक्रारीत गुन्हे दाखल करून घेतले. चेन स्नॅचिग, आर्थिक फसवणुकीच्या घटना टाळण्याचे प्रयत्न होतील. तसेच गुन्हे दाखल करून न घेणाऱ्या ठाणे अधिकाऱ्यांना जाब विचारला जातील. त्यामुळे पोलीस तक्रारीच दाखल करून घेत नाही. असे यापुढे ऐकायला मिळणार नाही असेही श्री पाटील यांनी स्पष्ट केले. 

पोलीस हेच कुटुंब, जबाबदारी माझीच 

पाटील म्हणाले की, जिल्ह्यात ३७०० पैकी ३६९ पोलिसांना कोरोनाची लागन झाली आहे. हे प्रमाण १० टक्के आहे. पोलीस दल हेच माझे कुटुंब असून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी माझीच आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांसाठी दिडशे खाटांचे कोवीड सेंटर उभारण्याचे प्रयत्न आहे. मालेगावची साथ आटोक्यात आली असली तरी, जिल्ह्यात कोरोना प्रसार टाळण्यासाठी अनलॉक काळात विशेष उपाययोजना केल्या जाणार आहे. मास्क न वापरणारे बेशिस्त नागरिकांवर कारवाया केल्या जाणार आहे. 

द्राक्ष उत्पादक ‘एसपी‘ 

पाटील स्वतः द्राक्ष उत्पादक असून, सांगलीत त्यांनीही द्राक्ष शेतीचा आतबट्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे भूमीपूत्र विशेष पोलीस महानिरीक्षक आणि द्राक्ष उत्पादक एसपी हा योगायोग जुळून आल्याने फसणाऱ्या द्राक्ष, डाळींब उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाऊ लागले आहे. विशेष म्हणजे, शेतकरी फसवणुकीच्या घटनांकडे गांर्भीयाने पाहिले जाऊ लागल्याने शेतकरी तक्रारीसाठी पुढे येऊ लागले आहे. गेल्या वर्षी अवघ्या २४ तक्रारी दाखल असलेल्या जिल्ह्यात यंदा वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच फसलेल्या शेतकरी तक्रारीची संख्या ५४५ इतकी झाली आहे. 

- जिल्ह्यात १० टक्के पोलिसांना कोरोना 
- शेतकरी फसवणूक २०० तक्रारी वाढल्या 
- ग्रामीण पोलिसांसाठी कोरोना सेंटर करणार 
- कोरोनामुळे ५६ गुन्हेगार पॅरोलवर बाहेर  

संपादन - रोहित कणसे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं मुंबईत राहत्या घरी निधन

BMC Election: मुंबईतील भाजपचा 'हा' अभेद्य किल्ला ठाकरे बंधू जिंकणार का? मारवाडी, गुजराती आणि जैन मतदारांच्या हाती निर्णय

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT