Rghunath Jagtap
Rghunath Jagtap Sakal
नाशिक

दराअभावी मिरची ‘तिखट’! शेतकऱ्याने उपटून टाकले दीड एकर पिक

सकाळ डिजिटल टीम

अंदरसूल (जि. नाशिक) : येवल्यात दुसऱ्यांदा लाल चिखल झाल्यानंतर आता मिरचीचा ठसका शेतकऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. अंदरसूल येथील शेतकरी रघुनाथ जगताप यांनी केलेल्या मिरचीला कवडीमोल मिळत असल्याने संतप्त शेतकरी रघुनाथ जगताप यांनी आपल्या दीड एकर मिरचीचे उभे पीक अक्षरश: उपटून टाकले.


शेतकरी जगताप यांनी एक लाख ८० हजार रुपये खर्च करून दीड एकरमध्ये मिरचीचे पीक घेतले होते. मात्र, दिवसेंदिवस या मिरचीला कवडीमोल भाव मिळत गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मिरचीचे पिक उपटून बांधावर फेकून दिले. तर, काही मिरचीची झाडेही उकिरड्यावर फेकून देत संताप व्यक्त केला. दिवसेंदिवस शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा हवालदिल झाला असून, आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने बळीराजाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT