gram panchayat election 
नाशिक

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; १५ जानेवारीला होणार मतदान  

संतोष विंचू

येवला (नाशिक)  : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार येवला तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यासाठी मंगळवार पासून प्रक्रिया सुरू होणार असून १५ जानेवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीची यात निवडणूक होणार असून राजकीय फड रंगू लागला आहे.

एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रत्येक तालुक्यातील सर्व प्रमुख ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक या वर्षभरात होणार आहे. यासाठी प्रभाग रचना तसेच मतदार यादी सोमवार ता. १४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्या अगोदरच गावांमध्ये निवडणुकीचे वातावरण तप्त झाले आहे.

गावोगावी राजकारणाचे फड 

तालुक्यातील या कालावधीत मुदत संपणाऱ्या ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. आज निवडणुकीचा कार्यक्रम प्रत्यक्षात जाहीर झाल्याने आता गावोगावी राजकीय वातवरण तप्त होण्याबरोबरच गटबाजी अन भाऊकीचे राजकारण देखील तापणार आहे.अनेकांनी महिना-दोन महिने पासुनच फिल्डिंग लावून वार्ड, पॅनल ठरविले आहेत. नेत्यांनी देखील पॅनल निर्मितीचा आराखडा कागदावर करून ठेवला असून आता लवकरच पॅनल व उमेदवार ठरणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम..

-तहसिलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे -१५ डिसेंबर
-नामनिर्देशनपत्रे मागविणे व भरण्याचा दिनांक – २३ ते ३० डिसेंबर
-नामनिर्देशन पत्रांची छाननी – ३१ डिसेंबर
-नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक - ४ जानेवारी
-निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध - ४ जानेवारी
-मतदानाचा दिनांक – १५ जानेवारी (शुक्रवार)
- मतमोजणी – १८ जानेवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT