Farmers are scared of the possibility of lockdown nashik marathi news 
नाशिक

शेतकऱ्यांनी घेतला लॉकाडउनचा धसका! नुकसानीची पुनरावृत्ती होण्याची भीती 

दीपक घायाळ

विंचूर (जि. नाशिक) : कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउनची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने याचा फायदा व्यापारी घेऊन त्याचा तोटा शेतकऱ्यांना होईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. 

शेतकर्‍यांना दुष्काळात तेरावा महिना

गेल्या वर्षी द्राक्ष व कांदा पिके काढणीला आलेली असतानाच कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे द्राक्षांचे नाइलाजास्तव शेतकर्‍यांना घरीच मनुके तयार करून कमी भावाने विकावे लागले. तसेच कांद्याची निर्यात खुली झाली अन् दुसर्‍या दिवशी लॉकडाउन झाल्याने कांदाही खूपच कमी दराने विकला गेला. याचा परिणाम शेतकऱ्यांना बसला. यातून शेतकरी अजूनही सावरलेला नसताना याही वर्षी पिक काढणीचा हंगाम सुरू होत असताना मागील वर्षाचीच पुनरावृत्ती होते की काय असा धसका शेतकर्‍यांनी घेतला आहे. आधीच नैसर्गिक अपत्तीने पाच सहा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. त्यात भर म्हणून याही वर्षी कोरोनाचे वाढते प्रमाण बघता शेतकर्‍यांना दुष्काळात तेरावा महिना आला आहे. त्यातून आता कसे पडावे अशी चिंता निर्माण झाली आहे.  

कोरोनामुळे गेल्या वर्षी शेतकर्‍यांचे नुकसान होऊन हाल झाले. त्यातून अजून शेतकरी सावरलेले नसताना तीच पुनरावृत्ती या वर्षी होते की काय अशी परिस्थिती आहे. शेतकर्यांना आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहेत. लॉकडाउन झाला तर शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. 
- संदीप गारे, शेतकरी, खानगाव बु. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT