NMC & Smart City Nashik News esakal
नाशिक

NMC News : स्मार्टसिटीकडे काम हस्तांतरित करण्याची धास्ती; जलशुद्धीकरण विस्तारीकरणास विलंब

सकाळ वृत्तसेवा

NMC News : शहराच्या जुने नाशिक व पंचवटी भागाला ज्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होतो. त्या केंद्राच्या विस्तारीकरणात विलंब होत असून स्मार्टसिटी कंपनीच्या कामाची पध्दत लक्षात घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग चिंतेत आहे.

३० महिन्यांच्या मुदतीचे कामात आत्तापर्यंत १३ महिने वाया गेले आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात काम करता येणार नाही. त्यामुळे उरलेल्या कालावधीचा विचार केल्यास वर्षभर या भागात पाणीपुरवठा होणारच नाही.

अशी स्थिती निर्माण होण्याची भीती असल्याने स्मार्टसिटी कंपनीसोबत करारनामा करण्याची तयारी केली जात आहे. (Fear of transfer of work to SmartCity Delay in water treatment expansion NMC Nashik News)

स्मार्टसिटी कंपनीमार्फत आत्तापर्यंत जे प्रकल्प पूर्ण झाले आहे व सद्यःस्थितीत जे प्रकल्प सुरू आहे ती कामे पूर्ण करताना विलंब झाला आहे. त्यातून आर्थिक नुकसान तर झालेच, त्याशिवाय नाशिककरांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

गावठाण पुनर्विकास योजना असो की, अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान स्मार्ट रस्ता तयार करण्याचे काम असो, कासवगतीने झालेल्या कामामुळेच हे प्रकल्प अधिक चर्चेत आले.

स्मार्टसिटी कंपनी व कंपनीकडून नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदारांच्या कामाची पद्धत लक्षात घेत महापालिकेचे अधिकारी आता जलशुद्धीकरण विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे काम संपूर्णपणे स्मार्टसिटीकडे हस्तांतरित करताना धास्तावले आहे.

प्रकल्प विस्तारीकरणात करार

स्मार्टसिटी कंपनीकडून १ एप्रिल २०२२ ला विश्वराज एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जलकुंभांवर स्काडा मीटर यंत्रणा बसवण्याबरोबरच बारा बंगला व पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम दिले आहे.

१७५ कोटी रुपयांचे हे काम असून, आतापर्यंत प्रशासकीय इमारत उभारण्या व्यतिरिक्त येथे काम झालेले नाही. ३० महिन्यांच्या कालावधीसाठी हे काम असून, त्यातील १३ महिने वाया गेले आहेत.

उर्वरित १७ महिन्यांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रांचे विस्तारीकरण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. स्मार्टसिटी कंपनीच्या कामकाजाची पद्धत लक्षात घेता महापालिकेचे अधिकारी जलशुद्धीकरण केंद्राचे काम देताना धास्तावत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या दोन्ही केंद्रांच्या माध्यमातून नाशिक शहरातील मुख्य भाग जोडला आहे. नवीन व जुने नाशिक व पंचवटी भागाला या दोन्ही केंद्रातून पाणीपुरवठा होतो. जवळपास ३० टक्के भागात पाणीपुरवठा या केंद्रातून केला जातो.

जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतल्यास तेवढ्याच गतीने काम होणे आवश्यक आहे.

पाणीपुरवठा बंद राहण्याची भीती

स्मार्टसिटी कंपनीच्या कामास करण्याची गती लक्षात घेता वर्ष लागल्यास तितक्या कालावधीसाठी या भागातील पाणीपुरवठा बंद राहील, अशी भीती आहे. जुने नाशिक व पंचवटीत दोन वेळेस पाणीपुरवठा करावा लागतो.

अशा वेळेस नागरिकांना एक वेळेसच पुरेसा पाणीपुरवठा न झाल्यास नागरिक अंगावर येतील. स्मार्टसिटी कंपनीऐवजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारतील. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राचे काम हस्तांतरित करण्यापूर्वी कामाचा कालावधी ठरवून घेण्यासाठी करार करण्याची तयारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

"जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला विलंब होत असला तरी या केंद्रावर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठा खंडित होवू नये याची काळजी घेण्यासाठी नियोजन सुरू आहे. आतापर्यंत प्रशासकीय इमारत पूर्ण झाली आहे."

- सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्टसिटी कंपनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT