मायको सर्कल व त्रिमूर्ती चौक येथे उड्डाणपूल बांधला जात आहे sakal
नाशिक

नाशिक : उड्डाणपुलाच्या वादाची उच्च न्यायालयात उद्या सुनावणी

मनपाला म्हणणे मांडण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथील उड्डाणपुलासंदर्भात भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २५) सुनावणी ठेवली आहे. यासंदर्भात महापालिकेला म्हणणे मांडण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे.

मायको सर्कल व त्रिमूर्ती चौक येथे उड्डाणपूल बांधला जात आहे. सुमारे अडीचशे कोटी रुपये किमतीच्या या पुलावरून अनेक वाद-विवाद झाले. नागरिकांचा विरोध, वाहतूक सर्वेक्षण न करताच उड्डाणपूल तयार केला जात असल्याच्या आरोपाने वादाला सुरवात झाली. मायको सर्कल येथे उड्डाणपूल आवश्‍यक असला, तरी त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाची आवश्‍यकता नसतानाही तो मंजूर करण्यात आल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. तर स्थानिक व्यावसायिकांनी देखील रोष व्यक्त करत आंदोलनाची भूमिका घेतली. श्रेयवाद सुरू झाला. भाजपच्या नेत्यांनी पुलाचे श्रेय घेतले. त्यानंतर सिमेंटच्या प्रतवारीवरून वाद झाला. तब्बल ४४ कोटी रुपये वाढविण्यात आल्याने अनेकांनी तोंडात बोटे घातली.

उड्डाणपुलाच्या फेरबदलात स्टार रेटची अट टाकताना नव्याने मंजुरी दिल्याने पुलाच्या संरचनेचा प्रश्‍न निर्माण झाला. संरचना बदलली जात असेल, तर नव्याने निविदा का काढली गेली नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला. विशिष्ट ठेकेदार डोळ्यांसमोर ठेवूनच प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप श्री. शहाणे यांनी करत उच्च न्यायालयात आव्हान दिले. भाजपचे सभागृहनेते कमलेश बोडके, गटनेता अरुण पवार, जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी देखील पुलाच्या निविदा प्रक्रियेवर संशय व्यक्त करत प्रशासनाविरोधात दंड थोपटले. त्रिमूर्ती चौकात उड्डाणपूल तयार करताना ५८८ वृक्षांची तोड होणार असल्याचा दावा करत वृक्षप्रेमी नागरिकांनी शनिवारी (ता. २२) उंटवाडी पुलाजवळील हेरिटेज वृक्षांखाली चिपको आंदोलन केले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी ट्विटरवरून संवाद साधताना वृक्षांची तोड होऊ न देण्याचे आवाहन केले. त्यानंतर आता पुलाच्या वादावर उच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी ठेवल्याने कायद्याच्या चौकटीतच वाद मिटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनसे जाणार न्यायालयात

२००५ पासून त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉलदरम्यान एकही अपघात झाला नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने वाहतूक कोंडीचा केलेला दावा चुकीचा असून, ठराविक लोकांना डोळ्यांसमोर ठेवून सिडकोत उड्डाणपूल उभारला जात असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी केला. त्याऐवजी शहरात लिंक रस्ते तयार करून वाहतूक वळविण्याची व्यवस्था करण्याची मागणी करतानाच या उड्डाणपुलाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT