pramod dani.jpg 
नाशिक

VIDEO : माजी नगरसेविकेची मायदेशी परतण्यासाठी तळमळ...'एअरलिफ्ट' करण्याची मागणी!

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (नाशिकरोड) अमेरिकेतल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने जलद गतीने कृती आराखडा आखून कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणी सध्या अमेरिकेत अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेविका वैशाली दाणी यांनी सरकारला केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका वैशाली दाणी दीड महिन्यांपासून अमेरिकेत अडकल्या आहेत. 'आमच्यासह अडकलेल्या अन्य भारतीयांना अमेरिकेतून एअरलिफ्ट करावे. भारतात परतण्यास मदत करावी,' अशी मागणी त्यांनी भारतीय वकिलातीसह, खासदार आणि नाशिकच्या नेत्यांना केली आहे.

विमानांची तिकीटे काढूनही ती रद्द 

तीन महिन्यांपूर्वी त्या आपल्या कुटुंबीयांसह अमेरिकेला गेल्या होत्या. त्यानंतर कोरोना संसर्ग वाढल्याने विविध बंधने आली. विमानसेवा बंद झाली. त्यामुळे त्यांनी विमानांची तिकीटे काढूनही ती रद्द झाली. सध्याच्या स्थितीचा विविध स्तरावर गैरफायदा घेतला जात आहे. विमान कंपन्या एरव्हीच्या तिकीटीवर सुमारे एक लाखांचे जादा शुल्क आकारात आहे. जादा शुल्क आकारुनही केव्हा सेवा सुरु होणार याची काहीच शाश्वती मिळत नाही. अमेरिकेत असे चार ते साडे चार हजार नागरीक विविध राज्यांत अडकले आहेत. यात बहुतांश ज्येष्ठ नागरीक आहेत. त्यांची औषधे संपली आहेत. ती उपलब्ध होत नाहीत. या नागरीकांना भारतात परतायचे आहे. मात्र सध्या तरी त्यांच्यापुढे काहीच मार्ग नाही. अमेरिकेत अडकून पडलेल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारतीय वकिलातीशी संपर्क करुनही कोणतीच कार्यवाही होतांना दिसत नाही. त्यामुळे भारत सरकारने तातडीने पावले उचलावी, याबाबतचे धोरण निश्‍चित करावे. अडकलेल्या भारतीय नागरीकांना 'एअरलिफ्ट' करुन मायदेशी आणावे,'' अशी मागणी त्यांनी केली आहे. 

भारत सरकारने जलदगतीने कार्यवाही करावी

नाशिकरोड येथील माजी नगरसेविका वैशाली दाणी, त्यांचे पती प्रमोद दाणी आणि सासूबाई अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलीना येथे अडकलेले आहेत. लॉकडाऊन झाल्याच्या आधीच त्या अमेरिकेत गेल्यामुळे त्यांना त्यांचा मुक्काम लांबवावा लागला. त्यांनी तीन वेळा विमानाची तिकिटे काढून ती तिकिटे पुन्हा रद्द करण्यात आली. भारतीय वकिलातीला या संदर्भात ईमेल केला आहे. मात्र त्याची जलद कार्यवाही होत नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अंदाजे चार ते पाच हजार भारतीय लोक अमेरिकेत अडकलेले आहेत. त्यांना आणण्यासाठी जलद गतीने भारत सरकारने योजना आखावी अशी आर्त हाक या भारतीयांनी दिली आहे. या संदर्भात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याशीही फोनद्वारे संपर्क साधून त्यांनी या घटनेची माहिती दिली. भारत सरकारने जलदगतीने कार्यवाही करावी असे वैशाली दाणी व त्यांचे पती प्रमोद दाणी यांनी सांगितले.

आम्ही तांत्रिक बाबींची पुर्तता केली आहे. भारत सरकारने पुढील कारवाई जलदगतीने करायला हवी. आम्ही दीड महिना राहण्याच्या उद्देशाने आलो होतो मात्र आता तीन महिने झाले आहेत. सासूबाईंच्या रक्तदाबाच्या गोळ्याही संपलेल्या आहेत. त्यामुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अडचणीच्या काळात विमानाच्या तिकीटासाठी एका व्यक्तीला एक लाख रुपये जास्तीचे मोजावे लागत आहे. - वैशाली दाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Latest Marathi News Updates : जालन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशी पीक गेलं पाण्याखाली

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Heavy Rain in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे नव्या खड्ड्यांची भर, मार्ग काढणेही अडचणीचे

SCROLL FOR NEXT