pramod dani.jpg
pramod dani.jpg 
नाशिक

VIDEO : माजी नगरसेविकेची मायदेशी परतण्यासाठी तळमळ...'एअरलिफ्ट' करण्याची मागणी!

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (नाशिकरोड) अमेरिकेतल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने जलद गतीने कृती आराखडा आखून कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणी सध्या अमेरिकेत अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेविका वैशाली दाणी यांनी सरकारला केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका वैशाली दाणी दीड महिन्यांपासून अमेरिकेत अडकल्या आहेत. 'आमच्यासह अडकलेल्या अन्य भारतीयांना अमेरिकेतून एअरलिफ्ट करावे. भारतात परतण्यास मदत करावी,' अशी मागणी त्यांनी भारतीय वकिलातीसह, खासदार आणि नाशिकच्या नेत्यांना केली आहे.

विमानांची तिकीटे काढूनही ती रद्द 

तीन महिन्यांपूर्वी त्या आपल्या कुटुंबीयांसह अमेरिकेला गेल्या होत्या. त्यानंतर कोरोना संसर्ग वाढल्याने विविध बंधने आली. विमानसेवा बंद झाली. त्यामुळे त्यांनी विमानांची तिकीटे काढूनही ती रद्द झाली. सध्याच्या स्थितीचा विविध स्तरावर गैरफायदा घेतला जात आहे. विमान कंपन्या एरव्हीच्या तिकीटीवर सुमारे एक लाखांचे जादा शुल्क आकारात आहे. जादा शुल्क आकारुनही केव्हा सेवा सुरु होणार याची काहीच शाश्वती मिळत नाही. अमेरिकेत असे चार ते साडे चार हजार नागरीक विविध राज्यांत अडकले आहेत. यात बहुतांश ज्येष्ठ नागरीक आहेत. त्यांची औषधे संपली आहेत. ती उपलब्ध होत नाहीत. या नागरीकांना भारतात परतायचे आहे. मात्र सध्या तरी त्यांच्यापुढे काहीच मार्ग नाही. अमेरिकेत अडकून पडलेल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारतीय वकिलातीशी संपर्क करुनही कोणतीच कार्यवाही होतांना दिसत नाही. त्यामुळे भारत सरकारने तातडीने पावले उचलावी, याबाबतचे धोरण निश्‍चित करावे. अडकलेल्या भारतीय नागरीकांना 'एअरलिफ्ट' करुन मायदेशी आणावे,'' अशी मागणी त्यांनी केली आहे. 

भारत सरकारने जलदगतीने कार्यवाही करावी

नाशिकरोड येथील माजी नगरसेविका वैशाली दाणी, त्यांचे पती प्रमोद दाणी आणि सासूबाई अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलीना येथे अडकलेले आहेत. लॉकडाऊन झाल्याच्या आधीच त्या अमेरिकेत गेल्यामुळे त्यांना त्यांचा मुक्काम लांबवावा लागला. त्यांनी तीन वेळा विमानाची तिकिटे काढून ती तिकिटे पुन्हा रद्द करण्यात आली. भारतीय वकिलातीला या संदर्भात ईमेल केला आहे. मात्र त्याची जलद कार्यवाही होत नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अंदाजे चार ते पाच हजार भारतीय लोक अमेरिकेत अडकलेले आहेत. त्यांना आणण्यासाठी जलद गतीने भारत सरकारने योजना आखावी अशी आर्त हाक या भारतीयांनी दिली आहे. या संदर्भात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याशीही फोनद्वारे संपर्क साधून त्यांनी या घटनेची माहिती दिली. भारत सरकारने जलदगतीने कार्यवाही करावी असे वैशाली दाणी व त्यांचे पती प्रमोद दाणी यांनी सांगितले.

आम्ही तांत्रिक बाबींची पुर्तता केली आहे. भारत सरकारने पुढील कारवाई जलदगतीने करायला हवी. आम्ही दीड महिना राहण्याच्या उद्देशाने आलो होतो मात्र आता तीन महिने झाले आहेत. सासूबाईंच्या रक्तदाबाच्या गोळ्याही संपलेल्या आहेत. त्यामुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अडचणीच्या काळात विमानाच्या तिकीटासाठी एका व्यक्तीला एक लाख रुपये जास्तीचे मोजावे लागत आहे. - वैशाली दाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT