Girish Mahajan and Eknath Khadse 
नाशिक

"खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले" गिरीश महाजन यांची टिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक वार अद्यापही सुरू आहे.

विक्रांत मते

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक वार अद्यापही सुरू आहे. खडसे यांची शिवराळ भाषेतील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची प्रतिक्रिया दिली.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदार संघातील वडगाव बुद्रुक या गावातील एका व्यक्तीने एकनाथ खडसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता गावात पाणी नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना खडसे यांनी महाजन यांच्या संदर्भात शिवराळ भाषेत विधान केले. त्यात खडसे यांनी महाजन फक्त पोरींचे फोन उचलतो, त्याचबरोबर मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडून महाजन पश्चिम बंगाल मध्ये काय फिरत बसलेत अशी टीका केली. त्यावर नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांना विचारले असता त्यांनी खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टिका केली. खडसे यांचा त्यात दोष नाही त्यांचे वय वाढले आहे, अनेक आजार असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. भाजपमध्ये असताना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघितलेल्या खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर साधी आमदारकी सुद्धा मिळू शकली नाही. त्यांच्या मुलीलाही लोकांनी नाकारले. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याची टीका महाजन यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! सलग 10 व्या दिवशी दर घसरले; उच्चांकापासून 29,000 रुपयांनी स्वस्त, आज महाराष्ट्रात किती भाव?

Ajanta Ghat Road : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! अजिंठा लेणी परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार; भूसंपादनासाठी राजपत्र होणार प्रसिद्ध, नव्या रस्त्याचा काय आहे प्लॅन?

Latest Marathi News Live Update : ठाणे मनपाच्या चौथ्या मजल्यावर आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Jalgaon News : देवदर्शनाहून परतताना अपघात, क्रूझरमधील नाशिकच्या २ महिलांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Solapur Banana: केळी उत्पादक शेतकऱ्यांचे ८०० कोटींचे नुकसान; पंढरपूर तालुक्यातील सुमारे ९०० एकरावरील केळीच्या बागा भुईसपाट

SCROLL FOR NEXT