Sakal - 2021-03-09T110422.672.jpg 
नाशिक

पिकअप-कंटेनरची जोरदार धडक; दोघे तरुण ठार, मुंबई-आग्रा महामार्गावरील भीषण अपघात

काळू राजोळे

वाडीवऱ्हे (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर गोंदे दुमाला फाट्याजवळील महाले पेट्रोलपंपासमोर झालेल्या अपघातात दोन ठार झाले. धडक इतकी भीषण होती, की पिक-अपचा चक्काचूर झाला. त्यात पिक-अपसह दोघे अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यास क्रेनची मदत घ्यावी लागली.

पिक-अपचा चक्काचूर

सोमवारी (ता. ८) पहाटे अडीचच्या सुमारास जळगावकडून भाजीपाला घेऊन महिंद्रा पिकअप (एमएच-१९-सी-वाय-६४४९) मुंबईकडे भरधाव जात होते. गोंदे दुमालाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच-०४-एलडी-५१२२)पिक-अपने पाठीमागून जोरदार धडक दिली. गंभीर जखमींना तत्काळ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एकजण जागीच ठार झाला.

अपघाताचा गुन्हा दाखल

राहुल ज्ञानेश्वर खडसे (२२), अतुल सुरेश बिराडे (२३, रा. उमाडा, ता. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. वाडीवऱ्हे पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT