Gram panchayat and farmers esakal
नाशिक

नाशिक : ग्रामपंचायत प्रशासन व शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाला ठोकले कुलूप

- दीपक खैरनार

अंबासन (जि. नाशिक) : येथील तलाठी कार्यालयात (Talathi office) संबंधित तलाठी वेळेत येत नाही, तसेच कार्यालयात मद्यपान करून शेतकऱ्यांची अडवणूक करीत अरेरावीची भाषा करतात 'तलाठ्यांना वायगावशी वावडे'च असा आरोप करीत अखेरीस संतप्त शेतकरी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कुलूप ठोकले व सदर तलाठ्याची बदली होत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा निर्णय घेतला. (Gram Panchayat administration and farmers locked the Talathi office at ambasan Nashik News)

वायगाव येथील तलाठी कार्यालयाबाबत नेहमीच तक्रारीचा सूर उमटत असून नाहक शेतकऱ्यांना अनेक अडचणींतून जावे लागत आहे. याबाबत अनेक वेळा वरीष्ठ कार्यालयात तक्रारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Din) ग्रामपंचायत प्रशासनाकडून घेतलेल्या ग्रामसभेत तलाठ्याविरोधात नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचून दाखवला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन वरीष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार केले होते. दरम्यान आजतागायत ग्रामपंचायतीने केलेल्या पत्रव्यवहाराची महसूल विभागाने दखल घेतली नसल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

तक्रारीत संबंधित तलाठ्याकडून शेतक-यांचे काम वेळेवर होत नाही व कार्यालयात कामानिमित्त येणा-या शेतकऱ्यांना हुसकावून लावतात. ऑनलाइन कामकाजात व शासकीय योजनेत वेळेचे बंधन असल्याने सदर कामे (सेवा) वेळेत मिळत नसल्याने शेतक-यांचे अर्थिक नुकसान होत आहे. तसेच शासकीय नियमानुसार आकारण्यात येणारी फी न घेता अवाजवी फी आकारली जाते दरम्यान प्रशासनाकडून आजादी का अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त मोफत सातबारा वाटप करण्यास सांगण्यात आले होते व दुरूस्त करण्यास सांगण्यात आले होते मात्र संबंधित तलाठ्याकडून तेही काम होऊ शकले नाहीत. बहुतांश शेतक-यांना तलाठ्याच्या निष्काळजीपणामुळे नुकसान भरपाई मिळू शकली नाही असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

महसूल विभागातील आधिकाऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रार दाखल केली होती वरिष्ठांनी फक्त चौकशी करून कारवाई करू असे सांगितले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने तलाठी कार्यालयाच्या दरवाजावर नोटीस चिटकवली व जोपर्यंत तलाठ्याची बदली होत नाही कुलूप उघडणार नाही तर ग्रामपंचायत कार्यालयालाही कुलूप ठोकण्यात येईल असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

"...विद्यार्थी शेतकरी महिलावर्ग यांनी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना तक्रार केली म्हणून सर्वांनी निर्णय घेऊन तलाठी कार्यालयास कुलूप लावले गावातील शेतकरी व विद्यार्थी वर्ग यांनी असे सांगितले की तलाठी यांची बदली झाली नाही तर वायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा कुलुप लावण्यात येईल. नवीन तलाठ्याची नेमणूक करून शेतकरी वर्गाची व विद्यार्थ्यांची समस्या सोडून वायगावला न्याय द्यावा."

- अशोक आहिरे, सरपंच, वायगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT