Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : जीवसृष्टीत वृक्षारोपणाशिवाय तरणोपाय नाही; गुरुमाउलींचे हितगूज

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : जागतिक तापमानवाढीचा धोका, भूगर्भातील पाण्याची घटणारी पाणीपातळी, पर्जन्याचा अभाव या साऱ्या गोष्टींना पर्यावरण असमतोल कारणीभूत असून, त्याकरिता जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी वृक्षारोपणाशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली श्री आण्णासाहेब मोरे यांनी केले.

दिंडोरी प्रधान क्षेत्री गुरुवारी (ता. १४) साप्ताहिक प्रश्‍नोत्तरे मार्गदर्शन आणि सत्संग समारोह पार पडला. (Gurumauli Annasaheb More guidance about importance of tree plantation nashik news)

बैलपोळा आणि पिठोरी अमावास्या या पर्वावर झालेल्या साप्ताहिक सत्संगाला राज्यभरातून मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते. त्या वेळी गुरुमाउलींचे अमृततुल्य हितगूज झाले.

गुरुमाउली म्हणाले, की सेवामार्गाने सव्वा कोटी महावृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. रोपांची लागवड आणि संवर्धन असे स्वयंअभियानाचे स्वरूप आहे. दोन वर्षांपासून ४० लाखांपेक्षा जास्त रोपांचे संगोपनही केले जाते. सेवेकरी वर्गासह सर्व क्षेत्रांतील नागरिक आणि विद्यार्थीही या उपक्रमास उत्साहाने सहभागी झाले आहेत.

याच जोडीला सीडबॉलचेही माळरान, मोकळ्या जागा, मैदाने तसेच रस्त्याच्या दुतर्फा रोपण करण्यात येते. हा सारा खटाटोप जीवसृष्टीसाठी आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीच्या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आपल्या हितगुजात गुरुमाउलींनी मूल्यसंस्काराचे महत्त्व अधोरेखीत केले. विना सोने-नाणे, हुंड्याशिवाय कमी खर्चात विवाह करण्याचे आवाहन त्यांनी केले. कर्करोगावरील वनौषधी सांगताना काही आजारांवर आयुर्वेदीक औषधे त्यांनी सांगितली.

पर्यावरण, स्वयंरोजगार, प्रशासकीय, वास्तुशास्त्र, कायदेशीर सल्लागार, कृषी या विभागांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. कौटुंबिक आणि वैयक्तिक समुपदेशनासाठी हजारो पीडित, दुःखी, कष्टी लोकांनी दिंडोरी प्रधान केंद्रावर मार्गदर्शन घेतले. बैलपोळा आणि पिठोरी अमावास्येचे महत्त्व गुरुमाउलींनी नमूद केले. त्यांच्या हितगुजानंतर पालखी सोहळ्यात सेवेकरी आनंदाने सहभागी झाले.

गोमय गणेशमूर्ती फायद्याची

वृक्षारोपणाचा धागा पकडून गुरुमाउली म्हणाले, की सेवामार्गाने गोमयापासून बनविलेल्या गणेशमूर्तींमध्ये आयुर्वेदीक वृक्षांच्या तीन बिया रोवल्या आहेत. त्यामुळे विसर्जन करण्याऐवजी मूर्तीचे खड्ड्यात रोपण केल्यास त्यातून कालांतराने आयुर्वेदीक वृक्ष जन्माला येतील आणि पर्यावरणाला हातभार लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT