Heavy rain update esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात पावसाचा कहर! नदीवरील पुल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने कादवा नदीला पूर आला आहे.

माणिक देसाई

नाशिक : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने कादवा नदीला पूर आला असून रवळस पिंपरी जवळील पातळी पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे निफाड सहकारी साखर कारखान्यावर जाणारा मार्ग बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

निफाड तालुक्यातील कादवा नदीला पालखेड धरणातून आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान 20770 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने कादवा नदी पात्रात प्रचंड प्रमाणात पाण्याची आवक झाली. त्यामुळे प्रशासनाने दखल घेत रवळस येथून निफाड सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गात बॅरिकेट टाकून प्रशासनाने सतर्कता म्हणून आधीच मार्ग बंद केला होता. दरम्यान पालखेड धरणाचे पाणी नदीपात्रात आल्याने पातळी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जवळपास 20 किलोमीटरचा फेरा पडणार आहे. असाच पाऊस चालू राहिल्यास या पावसाचा फटका परिसरातील वाहनधारक तसेच नागरिकांना बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT