Heavy Rain latest marathi news
Heavy Rain latest marathi news esakal
नाशिक

जिल्ह्यात पावसाची द्विशतकी अन दिंडोरीत त्रिशतकी ‘बॅटींग'

महेंद्र महाजन

नाशिक : पावसाची (Rain) विश्रांती...अधूनमधून संततधार...ढगाळ हवामान कायम अशी आज दिवसभरातील स्थिती राहिली. जिल्ह्यात आतापर्यंत १६४.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

बागलाण, कळवण, सुरगाणा, पेठ, निफाड, चांदवड, देवळा या तालुक्यात पावसाची द्विशतकी, तर दिंडोरी तालुक्यात त्रिशतकी ‘बॅटींग’ झाली. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ धरणांमध्ये ९१ टक्के जलसाठा झाला आहे.

१८ धरणांमधून विसर्ग सुरू आहे. त्याचप्रमाणे आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. (heavy rain in nashik ditrict Dindoori nashik Latest rain update news)

तालुकानिहाय आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात तालुक्यातील पावसाची टक्केवारी दर्शवते) : मालेगाव-११७ (१९२.३), बागलाण-१३ (२०२.३), कळवण-१२.१ (२६६), नांदगाव-६.८ (१५२.७), सुरगाणा-३८.४ (२१०.६), नाशिक-२०.३ (१६४.८), दिंडोरी-३८.३ (३३०.२), इगतपुरी-३३.५ (८०.९)

, पेठ-८५ (२४५.८), निफाड-१६.७ (२१०.८), सिन्नर-७.४ (१३१.४), येवला-१०.५ (१३३.३), चांदवड-१८.४ (२३४.६), त्र्यंबकेश्‍वर-२३ (१३४), देवळा-९ (२२८.४). गेल्यावर्षी ६३.६ टक्के पावसाची नोंद झाली होती आणि मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, देवळा तालुक्यातील पावसाचे प्रमाण १०० टक्क्यांच्यापुढे पोचले होते. शिवाय नांदूरमधमेश्‍वर धरणात १०० टक्के जलसाठा होता. जिल्ह्यातील धरणातील गेल्यावर्षी २९ टक्के जलसाठा होता.

नांदूरमधमेश्‍वरमधून ३२ टीएमसी विसर्ग

यंदाच्या पावसाळ्यात नांदूरमधमेश्‍वर धरणातून आज सकाळपर्यंत ३१.९० टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता. या धरणातून आज सायंकाळी ३२ हजार ४६२ क्यूसेस विसर्ग सुरु होता. त्याचप्रमाणे यंदा आज सकाळपर्यंत दारणातून ७.२३, गंगापूरमधून ४.२२, कडवामधून १.९० टीएमसी पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

गिरणा धरण ९२ टक्के भरले आहे. गिरणामधून ७ हजार १२८ क्यूसेस विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरणातील जलसाठा ६५ टक्के ठेऊन १ हजार ३७७ क्यूसेस विसर्ग सुरू आहे. इतर धरणांमधून सुरू असलेला विसर्ग क्युसेसमध्ये असा : आळंदी-४४७, पालखेड-१० हजार ३३२, करंजवण-४ हजार ७३०, वाघाड-२ हजार २१८, ओझरखेड-१ हजार ४६१, पुणेगाव-८०५, तिसगाव-१३०, दारणा-६ हजार ७२८, भावली-७०१, वालदेवी-२४१, कडवा-६४७, भोजापूर-५४०, चणकापूर-२ हजार ६८, हरणबारी-८४६, केळझर-३८८. नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्‍वरमधून गोदावरीमध्ये सुरु असलेल्या विसर्गाचे पाणी मराठवाड्यातील जायकवाडीपर्यंत पोचते.

जायकवाडीमध्ये आज दुपारपर्यंत ७७.१७ टक्के जलसाठा झाला होता. जायकवाडीमधून ७९ टक्क्यांपर्यंत जलसाठा पोचताच, विसर्ग सुरु करण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे.

मूग, मका अन सोयाबीनची पेरणी १०० टक्क्यांपुढे

जिल्ह्यात आतापर्यंत खरिपामध्ये ७५ टक्क्यांहून अधिक पेरण्या उरकल्या आहेत. भाताच्या लागवडीला वेग आला असल्याने यंदा खरिपाचे क्षेत्र शंभर टक्क्यांच्या आसपास पोचण्याची चिन्हे आहेत.

मक्याची लागवड १०६.०३, मुगाची पेरणी ११९.४८, सोयाबीनची पेरणी १३३.२३ टक्के झाली आहे. इतर पिकांखालील क्षेत्राची टक्केवारी अशी :

भात-१८.६१ ज्वारी-२२.११

बाजरी-५७.७५ नागली-६.७१

तूर-५५.३८ उडीद-२६.१९

भुईमूग-७३.८५ कापूस-८३.८७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT