Water scarcity esakal
नाशिक

NMC Water Scarcity Plan : पाणीटंचाई आराखडा सादर करण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

Water Scarcity Plan : पाणीकपातसंदर्भात मुख्य सचिवांकडे झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी २१ एप्रिलपर्यंत संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा उपाययोजनांसह सादर करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. (Instructions for submission of Water Scarcity Plan nashik news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

‘अल निनो’ वादळामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाणी संकट निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत पाणी जपून वापरण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीटंचाईचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या.

नाशिक महापालिकेकडून राज्याच्या मुख्य सचिवांकडे आराखडा सादर करण्यात आला. त्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून एक दिवस, तर जुलै व ऑगस्ट महिन्यात आठवड्यातून दोन दिवस असे पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु मुख्य सचिवांनी विभागीय आयुक्तांकडे निर्णय घेण्याचे अधिकार सोपविले. त्यानुसार महापालिकेला विभागीय आयुक्त गमे यांनी पत्र पाठवून २१ एप्रिलपर्यंत पाणीकपातसंदर्भात तयार केलेल्या उपाययोजनांचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेकडून अहवाल सादर झाल्यानंतर साधारण मे महिन्यापासून पाणी कपात होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT