Krishna janmashtami 2023 Esakal
नाशिक

Krishna Janmashtami : गोपालकाला... सामाजिक ऐक्याची मांदियाळी! वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनाचा उत्सव

सकाळ वृत्तसेवा

Krishna Janmashtami : निज श्रावण कृष्ण अष्टमीला म्हणजेच, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. ७) गोपालकाल्याचा उत्सव हर्षोल्हासात साजरा केला जातो. गोपालकाला उत्सवाला सामाजिक ऐक्याची मांदियाळी असते. वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनाच्या उत्सवाचे सूत्र आहे. (krishna janmashtami article about gopalkala nashik news)

चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥

बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥

खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥

तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवें ॥

अर्थात, गोपाल म्हणाले, ‘‘सवंगड्यांनो चला, आपण इंद्ररूपी गायींना अंतर्मुख करूयात आणि एका ठिकाणी बसून आनंदात जेवू. आतापर्यंत खूप वणवण झाली, पायपीट करून शीण आला आहे. खांद्यावर प्रपंचाचा भार आणि मनात सुखाची भूक असताना संसाराचा खेळ खेळण्यात सुख नाही.’’ संत तुकाराम महाराज म्हणतात, की गड्यांनो, आता जेवणाची घाई करा, त्यात आपले कल्याण आहे.

मुळातच, गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत, असा भाव भारतीयांच्या मनात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्रीकृष्ण जयंतीचा प्रसाद गोपालकाला म्हणून संबोधला जातो. कोकणात दहीकाला होतो. भगवान श्रीकृष्ण बालपणी सवंगड्यांसह गोकुळात घरांमध्ये टांगलेल्या शिंक्यातील मडक्यातील दही-लोणी खात असत.

त्याचे प्रतीक म्हणून तरुणाई मनोरे रचून दही-हंडी फोडते. ‘गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाले’ या गीतावर ठेका धरला जातो. मंदिरांमध्ये गोप (गोपाल) वेशात लहानग्यांना नेऊन दही-हंडी फोडण्याचा आनंद घेतला जातो.

काल्याच्या कीर्तनानंतर गोपालकाला केला जातो. त्यामुळे काल्याचे कीर्तन म्हटले जाते. ज्ञानेश्‍वरी, दासबोध पारायण, ग्रंथपठण, कीर्तन महोत्सवात शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी वारीची सांगता गोपालकाल्याने करतात.

संत तुकाराम गाथा अभंग

कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥१॥

काला वाटूं एकमेकां । वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥

वांकुलिया ब्रह्मादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥२॥

तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाढे ॥३॥

वारकरी संप्रदायाचे अभ्यासक माधवदास राठी महाराज म्हणाले, की भगवंताचे नामधारण केल्याने आत-बाहेर सगळीकडे प्रकाश आहे. भेद राहिलेला नाही. काला एकमेकांना देत आहोत. वैष्णव संभ्रमरहीत आहोत. मुळातच, भगवंताच्या नामाच्या लाह्या आणि स्निग्धतेचे प्रतीक असलेले दही प्रेममय आहे. म्हणजेच काय, तर जीव-ब्रह्म ऐक्याच्या प्रतीकाचा काला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT