Kolhapur type dam overflowing near Vyaghreshwar temple after releasing its last circulation into the Mosam riverbed for drinking water from the dam at Haranbari (T.Baglan).
Kolhapur type dam overflowing near Vyaghreshwar temple after releasing its last circulation into the Mosam riverbed for drinking water from the dam at Haranbari (T.Baglan). esakal
नाशिक

Nashik News: हरणबारी धरणातून अखेरचे आवर्तन; मोसम खोऱ्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मोसम खोऱ्यातील गावांना भेडसावणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हरणबारी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठीचे अखेरचे आवर्तन जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सोडण्यात आल्यामुळे मोसम खोऱ्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे. (Last avartan from Haranbari Dam Help to solve drinking water problem of villages in Mosam Valley Nashik News)

हरणबारी धरणातून मोसमनदी पात्रात यापूर्वी रब्बीसाठी दोनवेळा आवर्तन सोडण्यात आले होते. अखेरचे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असल्याने बागलाण व मालेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हरणबारी धरणातून पाणी सोडल्यामुळे बागलाण व मालेगाव तालुक्यातील सुमारे ८० टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे.

सुमारे १ हजार १६६ दशलक्ष घनफूट असलेल्या हरणबारी धरणावर बागलाणसह मालेगाव तालुक्यातील दीडशे गाव अवलंबून आहेत. मोसम खोऱ्यात गेल्या महिन्यापासून भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी ठप्प होऊन टँकरद्वारा गावांची तहान भागवावी लागत असे. पाणीटंचाईमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मोसम खोऱ्यातील पाणीबाणीच्या संदर्भात अनेक ग्रामपंचायतींनी ठराव करून हरणबारी धरणातून तातडीने पिण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी धरणात शिल्लक साठ्यापैकी सुमारे तीनशे दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनामुळे मुल्हेर, अंतापूर, ताहराबाद, सोमपूर, जायखेडा, आसखेडा, द्याने, अंबासन, वड़नेर खाकुर्ड़ी, अजंग वडेल आदीं मोठ्या गावांना दिलासा मिळाला आहे. हरणबारीच्या आवर्तनामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाटबंधारे विभागाचा इशारा

हरणबारीचे आवर्तन हे केवळ पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांनी वीज पंपाच्या साहाय्याने पाण्याची चोरी करू नये. तसेच मोसम नदीपात्रात पाणी अडविण्यासाठी बांध घालून अडथळा निर्माण करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT