dada bhuse2.jpg 
नाशिक

कृषिमंत्री म्हणताएत...'बळीराजाला आठवडाभरात कर्ज उपलब्ध होईल'

सकाळवृत्तसेवा

नाशिक : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत चार महिन्यांपूर्वीच निधी वर्ग करण्यात आला हाेता. मात्र, जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तो शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकला नाही. त्यानंतर गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेकडे ८७० कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आठवडाभरात कर्ज उपलब्ध होईल, असा विश्‍वास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

थेट बांधावर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू

जिल्हा परिषदेच्या जुन्या रावसाहेब थोरात सभागृहात कृषिमंत्री श्री. भुसे यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.13) जिल्ह्याची खरीप आढावा बैठक झाली. तत्पूर्वी श्री. भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. थेट बांधावर जाऊन बळीराजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर आदी या वेळी उपस्थित होते. दरम्यान, राजस्थान मधील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील महाआघाडी सरकारबाबत विचारले असता, त्यांनी बोलणे टाळले.

तर महाबीजवर कारवाई

सदोष बियाण्यांच्या पुरवठ्याबाबत सुमारे पन्नास हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ७० टक्के तक्रारींची पडताळणी करण्यात आली आहे. यात सोयाबीनच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. याबाबत महाबीजच्या बियाण्यांची पडताळणी सुरू आहे. यात दोषी आढळल्यास महाबीजवरही कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन श्री. भुसे यांनी दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT