Divorce
Divorce esakal
नाशिक

Marriages During Corona : अल्पावधीतच वाढली नवविवाहितांची घटस्फोटांची मागणी!

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कोरोना आला आणि अनेकांना अनाथ, निराधार, निराश्रित करून आता शांत झाला. मात्र, त्याचे दूरगामी परिणाम अजूनही दिसत आहेत. कोरोनाच्या निर्बंधात साध्या पद्धतीने विवाह उरकलेल्या मुलींच्या संसारात आता मानपान, हुंडा, संशयातून भांडणतंटे वाढले आहेत.

दोन वर्षांत निफाड तालुक्यातील तब्बल ११७ विवाहितांनी सासरच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली आहे. (Marriages During Corona demand for divorces of newlyweds increased in short time)

अनेक पालकांनी कोरोनाकाळात घरी बसून असलेल्या मुलींचा विवाह साध्या पद्धतीने उरकला. त्या वेळी निर्बंध असल्याने वन्हाडी बोलावणे, थाटात विवाह करण्यावर बंधने होती. पालकांनी खर्च कमी होतोय, मुलीला चांगला पती मिळतोय, या आशेपोटी मुलींचे विवाह उरकले.

परंतु, कोरोनाकाळात अनेकांची नोकरी, रोजगार गेला. त्यातून आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आणि मुलीच्या सासरच्यांनी वेगवेगळ्या कारणांवरून नवविवाहितांचा छळ सुरू केला. कर्ज फेडायला माहेरून पैसे आण, मुलाला व्यवसायासाठी, नवीन घर व वाहनासाठी माहेरून पैसे आण म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला.

अनेक सासरच्यांकडून होणारा त्रास सहन न झाल्याने चार भिंतीत वावरणारी सुशिक्षित नवविवाहिता आता थेट पोलिसांत धाव घेत आहे. ज्या पतीसोबत सात जन्माची स्वप्ने पाहिलो, त्याच्याविरुद्धच विवाहिता पोलिसांत दाद मागत आहेत. पोलिसांतील महिला सुरक्षा कक्ष (भरोसा सेल) हे वाद आपपसांत मिटवून तुटू लागलेला संसार जोडण्याचा प्रयत्न करीत आहे.

याबाबत ॲड. राजेंद्र थिटे यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की कोरोनानंतर घटस्फोटाची मागणी करणाऱ्या अर्जांची संख्या दुपटीने वाढली आहे. दोन वर्षांत दीड ते दोन हजार अर्ज कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले आहेत. कौटुंबिक वादविवाद, विवाहातील मानपान, हुंडा, कर्जबाजारीपणा, संशय ही त्यामागील कारणे आहेत.

सुखी संसारातील कलहाची कारणे

*विवाहात मानपान केला नाही, हुंडा, वस्तू दिल्या नाहीत

*सुशिक्षित असूनही घरातील कामे जमत नाहीत, मुलगीच झाली

*मोबाईलचा अतिवापर, विवाहितेवर संशय घेणे

*कर्ज झालंय, व्यवसाय सुरू करायचा आहे, वाहन, घर घ्यायचे आहे.

*मुली शिकलेल्या असल्याने सासरच्या त्रासाला बळी पडत नाहीत

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

बिनहुंड्याची तुला नांदवणार नाहीच...

निफाड तालुक्यात दर महिन्याला सरासरी पाच विवाहिता सासरच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतात, अशी स्थिती आहे. दरम्यान, निफाड तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहानंतर काही महिन्यांतच आर्थिक चणचणीमुळे कौटुंबिक वादविवाद सुरू झाले.

विवाहात मानपान व्यवस्थित केला नाही, माहेरून दहा लाख रुपये आण, नाहीतर तुला नांदवणार नाही म्हणून सतत संशय घेऊन पतीसह सासरच्यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद नवविवाहितेने पोलिसांत दिली. त्यावरून पती सासरा, दीर, नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT