Sanjay Raut Esakal
नाशिक

Sanjay Raut | यापुढे राज्यात खोक्यांचे राजकारण चालणार नाही : खासदार संजय राऊत यांचा घणाघात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेनेचा वणवा आता संपूर्ण राज्यभर पेटला असून, या वनव्याशी आता कुणी खेळण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेतून जे गेले ते गद्दार आहे. या गद्दारांवर आता सूड उगवण्याची वेळ आली आहे. राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी जनता आतुर झाली असून, या माध्यमातून नाशिक महापालिकेवर भगवा फडकवतील.

असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. यापुढे राज्यात खोक्यांचे राजकारण चालणार नाही, अशी तजवीज शिवसेना करेल. त्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे राऊत म्हणाले. (MP Sanjay Raut attack on eknath shinde group maharashtra politics nashik news)

शिवसेनेच्या शालीमार येथील कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना राऊत म्हणाले, की इतिहास निष्ठावंतांचा लिहिला जातो. गद्दारांचा नव्हे, गद्दारांवर सूड उगवण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनादेखील बेइमान लोकांचा त्रास झाला होता.

स्वराज्याचे स्वप्न साकारताना महाराजांनी २२१ लढाया स्वकीयांशीच लढल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. तेव्हादेखील त्यांना स्वकीयांशीच सामना करावा लागला होता. माझ्या पाठीत खंजीर खुपसायला जागाच शिल्लक नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब नेहमी सांगत.

त्यामुळे शिवसेनेला गद्दारीचे संकट नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक संकटातून शिवसेना अनेकदा उभी राहिली आहे. गद्दारा विरोधात संतापाची लाट उसळली आहे. निष्ठावंत शिवसैनिक अधिक जोमाने पेटून उठला आहे. जनतादेखील निवडणुकीची वाट पाहत असून ज्यांनी गद्दारी केली. त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

मतदान हे खोक्यांवर चालत नाही असा घाणाघात राऊत यांनी केला. शिवसेना अस्वला सारखी आहे. अस्वलाचे काही केस गळून पडले तरी फरक पडत नाही. परंतु शिवसेनेला सोडून जे गेले तेथे अस्वल कोण आणि मदारी कोण, मदारी अस्वलाला नाचवतो की अस्वल मदारीला नाचवते, हे कळत नाही.

‘ते चप्पल चोर’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कंट्रोल करणारे महामदारी दिल्लीत बसल्याची टीका त्यांनी केली. शिवसेना हे मंदिर असून, शिवसेनाप्रमुख हे मंदिरातील दैवत आहे. या मंदिरात चोरी करणारे गद्दार महाराष्ट्राने पाहिले आहेत. या गद्दारांना महाराष्ट्र सोडणार नाही. ते चप्पल चोर आहेत, अशी टीका त्यांनी केली.

बेईमानांना दरवाजे बंद असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे उपनेते बबन घोलप जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचीही भाषणे यावेळी झाली. उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, आमदार नरेंद्र दराडे, माजी महापौर वसंत गिते, विनायक पांडे, गटनेते विलास शिंदे, सचिन मराठे, महेश बडवे आदी या वेळी उपस्थित होते.

४० आमदार, १२ खासदार कुठे जातील?

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मिशन १४५ ची घोषणा केली. तर लोकसभा निवडणुकीसाठी मिशन ४५ ची घोषणा केली. भाजपच्या या मिशनची खिल्ली उडवताना शिंदे गटात गेलेले ४० आमदार व बारा खासदार कुठे जातील, असा सवाल राऊत यांनी केला. यावर शिवसैनिकांनी ते सर्व घरी जातील, अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT