Accident esakal
नाशिक

Nashik Accident News : माणिकखांब शिवारात अपघात; 2 चुलत बंधू ठार, एक जखमी

Nashik Accident : मुंबई-आग्रा महामार्गावरील माणिकखांब शिवारात शनिवारी (ता. २४) भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावरील माणिकखांब शिवारात शनिवारी (ता. २४) भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातग्रस्त कार तीन वेळा पलटी होऊन नाल्यात कोसळली. अनिल निवृत्ती गोवर्धने (वय ३५), सुनील (बाळू) गणेश गोवर्धने (३८, दोघेही रा. सांजेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक) अशी ठार झालेल्या दोन चुलत भावांची नावे आहेत. (Nashik Accident in Manikkhamb marathi news)

पोपट (पप्पू) मुरलीधर गोवर्धने असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल गोवर्धने, सुनील गोवर्धने व पोपट गोवर्धने हे कारने वाडीवऱ्हे येथून नाशिकच्या दिशेने शनिवारी (ता. २४) रात्री साडेदहाच्या सुमारास येत होते. कार माणिकखांब शिवारात आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. (latest marathi news)

त्यामुळे कार तीन पलट्या घेऊन महामार्गालगतच्या नाल्यात पडली. या भीषण अपघातात तिघे जखमी झाले. जखमींना नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेमार्फत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत दोघांना मृत घोषित केले. जखमी पोपट गोवर्धने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे माणिकखांब गावावर शोककळा पसरली आहे. वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT