Pedestrians and school girls have to make their way through Nandgaon city in heavy vehicles. esakal
नाशिक

Nashik News : नांदगावला बायपास हाच पर्याय! महामार्गावरील वाहतूक दहापटीने वाढली

Nashik News : मालेगाव, येवला, मनमाड, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर या पाच शहरांना जोडणारा मुख्य महामार्ग नांदगांव शहरातुन जातो.

प्रतीक जोशी

अरुण हिंगमिरे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मालेगाव, येवला, मनमाड, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर या पाच शहरांना जोडणारा मुख्य महामार्ग नांदगांव शहरातुन जातो. गेल्या दहा -पंधरा वर्षात या मार्गाने जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्या दहापटीने वाढल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी तोकडा पडून लागल्याने त्यांचे रूंदीकरण अथवा पर्यायी बायपास हे दोनच मार्ग सध्या येथील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यास उपलब्ध आहेत. (bypassing Nandgaon is only option to control traffic)

रूंदीकरणापेक्षा पर्यायी बायपास हाच यावर उत्तम पर्याय आहे. गेल्या तीस वर्षांपूर्वी बायपाससाठी सर्वेक्षणही झालेले आहे मात्र त्यावर पुढे काहीही हालचाल झालेली नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. महामार्ग शहरातून जात असल्याने साहजिकच कृषी उत्पन्न बाजार समिती, बसस्थानक, पोलिस ठाणे, शासकीय विश्रामगृह, स्टेट बँकेसह इतर बॅंका.

रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप तसेच राजकीय पक्षांची कार्यालये यामुळे या महामार्गावर सतत वर्दळ असते. सर्वात महत्वाचे म्हणजे या रस्त्यालगतच येथील मुख्य व्यापारपेठेत येण्याजाण्याचा रस्ता, दोन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, वन विभागाचे कार्यालय यामुळे सर्वसामान्य जनतेचे विविध कामांसाठी नियमित जाणे येणे असते. विद्यार्थ्यांना दररोज याच रस्त्याने जावे लागते.

पाच शहरांना जोडणारा मुख्य रस्ता हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून गेला आहे, मात्र तो अरूंद असल्याने नांदगाव शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. यात आवजड वाहनांचे प्रमाण अधिक असते. या वाहतूक कोंडीमुळे शहरात ध्वनी, वायू प्रदुषणासोबत अपघातही होत असतात. अनेक वाहने नांदगाव शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा लावलेली असतात, त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडते. (latest marathi news)

सकाळी व सायंकाळी शाळेच्या वेळेत मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. त्यामुळे पादचारी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक, महिलांना रस्ता ओलांडताना जिवावर बेतण्याची शक्यता असते. यापूर्वी याच मार्गावर शालेय विद्यार्थी व पादचारींना अपघातात प्राण गमवावे लागले.

त्यामुळे शहरातील रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे. मालेगाव, येवला, मनमाड, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर या पाच शहरांना जोडणारा प्रमुख मार्ग हा नांदगाव शहराच्या बाहेरून बायपास रस्त्याची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शिवाय नित्याची होणारी वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार नाही व मार्ग देखील निघणार नाही.

तीस वर्षांपूर्वीच सर्वेक्षण

नांदगावात १९९० च्या दशकात शहराच्या बाहेरून वळण रस्ता करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण शहराच्या चारही बाजूंनी झाले होते आणि त्यावेळी झालेल्या सर्व्हेक्षणाप्रमाणे बायपास रस्ता होऊन शहराचा विस्तार व विकास झपाट्याने झाला असता. येथील एका बड्या हस्तीच्या काही वैयक्तिक स्थावर मालमत्तेमधून नियोजित रस्ता जाणार होता.

म्हणून हा रस्ता होऊ नये, यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. रस्त्याच्या सर्व्हे झालेल्या नियोजित कामावर पांघरूण घालण्यास आणि गुंडाळण्यात यशस्वी झाल्याने येथील बायपास रस्त्याचे काम आणि शहराचा विकास विस्तार रखडला, निदान आतातरी त्या कामाला गती यावी अशी अपेक्षा शहरवासीय बाळगून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोपी वृद्ध, क्रूर गुन्हा करू शकतो का? नराधमाच्या वकिलांनी केली जन्मठेपेची मागणी, न्यायाधीशांनी फेटाळला युक्तिवाद

Sanjay Manjrekar: रोहित, विराट किंवा बुमराह नाही...'; टीम इंडियाच्या निवडीवर संजय मांजरेकर स्पष्टच बोलले म्हणाले यशस्वी जैस्वालला...

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT